फोटो सौजन्य- pinterest
आपल्यापैकी अनेकांना आपल्या आयुष्यात अशा लोकांकडून वारंवार विश्वासघात होतो ज्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो. जेव्हा कोणी आपल्यावर मागून हल्ला करतो तेव्हा आपले हृदय तुटते अशा घटना वारंवार आपल्या सोबत घडल्यास आपल्या मनात प्रश्न येतो की, प्रत्येक वेळी माझ्यासोबत विश्वासघात का होतो? नीतीशास्त्रात सर्वात कुशाग्र बुद्धिजीवी आणि रणनीतीकारांपैकी एक मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये कोणत्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणापासून अंतर ठेवले पाहिजे हे स्पष्टपणे स्पष्ट केले आहे. प्रत्येक वेळी तुमची फसवणूक होते आहे का, जाणून घ्या चाणक्याचे नियम
चाणक्याच्या म्हणण्यानुसार, जो माणूस न समजता इतरांवर विश्वास ठेवतो, तो स्वतःच्या जीवनात दुःख आणि फसवणुकीचे कारण बनतो. याचा अर्थ असा होतो की एखाद्याच्या गोड बोलण्यावर, चेहऱ्यावरील निरागसतेवर किंवा दिसण्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. विश्वासाचे नाते हे वेळेने आणि अनुभवाने तयार होते, लगेच नाही.
जर तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या भूतकाळाची आठवण करून देऊन वारंवार लाजवत असेल, तर समजून घ्या की तो फक्त तुमची कमकुवतपणा शोधत आहे. तुम्हाला कधी असे वाटले आहे का? तरीही त्याच्याशी नाते टिकवले आहे का? वेळ आल्यावर असे लोकच सर्वात आधी तुमचा विश्वासघात करतात.
चाणक्याच्या मते, गुपिते सर्वांना सांगणे शहाणपणाचे नाही. तुमच्या वैयक्तिक बाबी तुमच्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. कोणावरही इतका विश्वास ठेवू नका की त्यांना तुमची गुपिते कळतील. अन्यथा पुढचा विश्वासघात फक्त एका संधीच्या अंतरावर असेल.
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, अशी लोक सर्वात धोकादायक असतात. जर कोणी तुमच्याशी गोड बोलतो पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतो, तर त्याच्यापासून दूर राहणे शहाणपणाचे आहे. तुम्हीही जुन्या नातेसंबंधांच्या किंवा कुटुंबाच्या नावाखाली अशा लोकांनमुळे तुमची देखील फसवणूक होते आहे का?
सर्वांना समजून घेताना त्याचा तुमच्या संबंधावर खोलवर परिणाम होणारे असू शकते. तुम्ही सुद्धा लोकांमुळे सहज प्रभावित होतात का होत असल्यास स्वतःमध्ये बदल करण्यास शिका, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
एखादी गोष्ट शिकताना स्वतःला दोष देणे थांबवा. तुम्हाला येणारे विविध अनुभव त्याचा तुम्हाला भविष्यात अधिक फायदा होऊ शकतो. चुका या प्रत्येकाकडून होत असतात. पण त्या चुकांमधून शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)