Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?
अधिकृत माहितीनुसार, रुबियो आपल्या चार दिवसीय दौऱ्यात भारतात नवी दिल्लीसह कोलकाता, आग्रा आणि जयपूर या प्रमुख शहरांना भेट देणार आहेत. रुबियो यांची ही पहिलीच क्वाड बैठक असून याला दौऱ्याला विशेष राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
उर्जा भागीदारीवर भर : सध्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक उर्जा पुरवठा विस्कळीत झाले आहे. परंतु दुसरीकडे अमेरिका उर्जेच्या उत्पादनात अग्रण्य आहे. अशी परिस्थिती भारतात झालेला इंधन तुटवडा कमी करण्यासाठी अमेरिका भारताला मदत करण्यास तयार आहे. यामुळे बैठकीत यावर विशेष लक्ष केंद्रित असेल.
क्वाड देशांची बैठक : याशिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि सहकार्य वाढवण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांच्या क्वाड बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संघटनेत ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारताचा समावेश आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा याचा हेतू आहे.
विशेष म्हणजे, या दौऱ्यानंतर पुढील आठवड्यात व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्जही भारत दौऱ्यावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिका-भारतात व्हेनेझुएला तेल खरेदीबाबत नवीन धोरण तयार होऊ शकते.
दरम्यान मार्के रुबियो, भारत हा अमेरिकेचा अत्यंत विश्वासू आणि खंबीर भागीदार असल्याचे म्हटले. तसेच सध्याच्या कठीण परिस्थितीत भारताच्या उर्जा गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिका मदत करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
त्यांनी जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अडथळे पाहता, भारताने आपली उर्जा गरज भागवण्यासाठी अमेरिकेला संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
सध्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रुबियो यांचा हा दौरा अमेरिका भारतातील व्यापारी संबंध सुधारण्यासाठीच नव्हे, तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हानांना सामोर जाण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.






