फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी २० मार्च रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत संपणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी सूर्योदय होईल, तर दुपारी १२ वाजून ०४ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंतचा अभिजित मुहूर्त पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे.
वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसाचे ब्रह्म पुराणात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे महहालयानंतर जेव्हा ब्रम्हदेवाने विश्वाची उत्पत्ती केली तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, या दिवशी पृथ्वीतलावर नवजीवनाची निर्मिती करण्यात आली. तसेच एका पौराणिक कथेनुसार श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून नकारात्मकतेवर विजय मिळवला आणि १४ वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परतले. म्हणून या दिवशी विजयोत्स्व साजरा करण्याहेतू गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली.
गुढी उभारण्यासाठी मोठी काठी, साडी किवा वस्त्र, फुले, फुलांचा हार, कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी, रांगोळी, हळदीकुंकू अक्षता, नैवेद्य, कलश या गोष्टी वापरल्या जातात.
सर्वात आधी गुढी उभारण्यासाठी एक लाख काठी घ्यावी, तुम्हाला जेवढी उंच गुढी उभारायची आहे त्याप्रमाणे उंचीची काठी घ्यावी. यानंतर काठी स्वच्छ करून घ्यावी.
काठी स्वच्छ केल्यानंतर काठीला साडी किंवा कापड बांधा. साडीप्रमाणे कापडाला निऱ्या घातल्यात तर गुढी खूपच सुंदर दिसेल.
यानंतर काठीला कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलाचा हार, साखरेची माळ बांधावी. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या तुम्ही ठेवू शकता.
ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहात तेथील जागा स्वच्छ करून घ्या. छोटासा पाट ठेवून सभोवताली सुंदर रंगांची रांगोळी काढा. आता त्यावर काठी ठेवून गुढी उभारावी.
गुढी उभारल्यानंतर फुले, अगरबत्ती किंवा धुप लावून गुढीची पूजा करावी. पुजा झाल्यानंतर गुढीला नैवैद्य दाखवावा.
गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची पूजा करावी. यानंतर विधीनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा करावी. ओम ब्रह्मणे नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच दुर्गा मातेचे ध्यान करावे. पूजेपूर्वी, पूजेनंतर, संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे, कडुलिंबाच्या पानांची पावडर करून त्यात मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी, सेलेरी आणि साखर घालून खावे. दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हरिद्राचे काही दाणे टाकावेत, गुढी नावाचा ध्वज या दिवशी फडकवावा.
गुढीपाडव्याच्या दिवशी नखे कापू नयेत. तसेच दाढी, मिशा आणि केस कापू नयेत. पूजा करताना चुका करू नयेत. दिवसा झोपू नये, या दिवशी मांसाहार आणि मद्य सेवन करू नये, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू उधारीवर घेणे टाळावे. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात असे मानले जाते. या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करण्याचे टाळावे, कारण लोखंड नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर स्वच्छ करून रांगोळी काढावी, गुढी उभारावी आणि देवपूजा करावी. तसेच कुटुंबासोबत सण साजरा करून गोड पदार्थांचा आस्वाद घ्यावा.
Ans: गुढीसाठी एक लांब बांबू घ्यावा. त्यावर रेशमी किंवा नवीन कापड बांधावे. त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांची माळ आणि साखरेच्या गाठी लावाव्यात. शेवटी त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवून गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभी करावी.
Ans: गुढी विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. घरासमोर गुढी उभारल्याने सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात अशी श्रद्धा आहे.






