फोटो सौजन्य- pinterest
दहीहंडीचा सण आज शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा सणाचा संबंध श्रीकृष्णाशी आहे. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या विलास, लोणी चोरी आणि त्यांच्या खोडकर स्वभावाचे प्रतीक आहे. त्यांच्या बालपणी ज्यावेळी तो लोणी आणि दही चोरायचा, त्यावेळी गोपी आणि गोकुळातील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, जो आता आपण उत्सव म्हणून साजरा करतो.
दहीहंडीचा सण आज शनिवार, 16 ऑगस्ट रोजी आहे. कृष्ण पक्षाची अष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता होईल.
घर आणि देव्हारा स्वच्छ करुन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती माती किंवा पानांनी सजवलेल्या जागेवर ठेवा. त्याच्या जवळ, नवीन हंडी (भांडे) ताजे दही, तूप, गूळ आणि फळ ठेवा. या दिवशी भाविक निरहार उपवास करतात किंवा हलके फळे आणि दुधाचे अन्न खातात. यावेळी तुम्ही आधीच हंडी सजवून ठेवू शकता. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर फुले, तांदूळ, लोणी, दही आणि फळे या गोष्टी अर्पण करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा. कीर्तनाच्या वेळी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला हंडीचा अर्घ्य अर्पण करा. हा प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटा. त्यानंतर आरती भजन करावे.
दहीहंडीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म आणि त्याची लीला साजरी केली जाते. दहीहंडीचा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीलाला समर्पित आहे. हा उत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक देखील आहे.
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित मुख्य सण आहे. यालाच गोपाळकाला असेही म्हटले जाते. यावेळी गोविंदा उंचीवर बांधलेले मडके फोडण्यासाठी एक गट तयार करुन मनोरे रचतात. तसेच ते गोंविदा रे गोपाळा, बोलबजरंग बली की जय या घोषणा देखील देतात.
दहीहंडी सणाला एक धार्मिक कथा देखील आहे. द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण लहानपणी लोकांच्या घरातून लोणी चोरून ते आपल्या मित्रांमध्ये वाटून खात असत. त्यामुळे त्याचा त्रास गोपींना होत असे. म्हणून त्यांनी लोणीचे भांडे एका उंच ठिकाणी टांगण्यास सुरुवात केली, परंतु त्यांचा हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला.
श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत मनोरे रचून भांड्यातून लोणी आणि दही चोरून खात असत. कान्हाची ही बालपणीची कृती दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशी त्याची आठवण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
महाराष्ट्र, मथुरा, वृंदावन आणि उत्तर प्रदेश येथे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)