सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NAM, T20 World Cup 2026: आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा १८ वा सामन्यात भारत आणि नामिबिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नामेबियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया देताना अभिषेक शर्माच्या तंदरुस्तीबाबत भाष्य केले आहे.
टॉस गमावल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, तो प्रथम फलंदाजी करू इच्छित होता. याचा अर्थ टॉस गमावल्यानंतर देखील त्याची मनापासूनची इच्छा पूर्ण झाली आहे. सूर्याच्या मते, जोपर्यंत त्याचा संघ सामने जिंकत आहे तोपर्यंत त्याला टॉस गमावण्यास काही एक हरकत नाही. भारतीय कर्णधार म्हणाला की, विकेट चांगली दिसते आणि त्याचे फलंदाज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास खूप उत्सुक आहेत. संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसन तर मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत. सूर्यकुमार यादव म्हणाला की अभिषेकला तंदुरुस्त होण्यासाठी अजून काही वेळ लागेल, कदाचित एक किंवा दोन सामने, तो कालावधी असू शकतो.
नामेबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने टॉस जिंकल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आमच्याकडे एक गोलंदाज असणार आहे. हा एक अतिशय चांगला सपाट क्रिकेटिंग पृष्ठभाग असून पृष्ठभाग आणि दव दृष्टिकोनातून ते करणे योग्य असणार आहे. ते आमचे कौशल्य मजबूत करण्याबद्दल आहे. चांगली विकेट दिसत असून दुसऱ्या हाफमध्ये त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच आम्ही मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतो आहोत. आमच्याकडे दोन बदल करण्यात आले आहेत.”
भारत प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन (w), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो






