• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • 94 Years Ago Mahatma Gandhis Dandi March Marked A Key Moment In Indias Freedom Struggle Nrhp

महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला 94 वर्षे पूर्ण; भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा

१२ मार्च हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णदिन मानला जातो. याच दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या अन्यायकारक मीठ कायद्याला विरोध करण्यासाठी ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2025 | 09:17 AM
94 years ago Mahatma Gandhi's Dandi March marked a key moment in India's freedom struggle

महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला 94 वर्षे पूर्ण; भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली – १२ मार्च हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णदिन मानला जातो. याच दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या अन्यायकारक मीठ कायद्याला विरोध करण्यासाठी ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली होती. या आंदोलनामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी दिशा मिळाली आणि इंग्रज साम्राज्याच्या नीतीला आव्हान उभे करण्यात यश मिळाले.

दांडी यात्रा: सविनय कायदेभंग चळवळीचा महत्त्वपूर्ण अध्याय

१९३० मध्ये सुरू झालेली दांडी यात्रा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानली जाते. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहासाठी २४० मैल (३८६ किलोमीटर) अंतर पार करत गुजरातमधील दांडी या गावात पोहोचले. तिथे त्यांनी ६ एप्रिल रोजी समुद्रकिनारी मीठ तयार करून ब्रिटिशांच्या मीठ कायद्याचा भंग केला. या यात्रेत गांधीजींसोबत ७९ सत्याग्रही सहभागी झाले होते, मात्र जसजशी यात्रा पुढे सरकत गेली, तसतसे हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले. गांधीजी दररोज तब्बल १६ किलोमीटर चालत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील हे आंदोलन पूर्णतः अहिंसक होते.

हे देखील वाचा : अमेरिकेत सध्या ‘पेन’ बनले वादाचे कारण; फक्त एका लेखणीवरून उडाली खळबळ, वाचा यामागचे कारण

लोकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि स्वातंत्र्यलढ्याला मिळालेली गती

दांडी यात्रेने भारतभर स्वातंत्र्याची जाणीव अधिक दृढ केली. या आंदोलनाला देशभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आणि ब्रिटिश सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली. लाखो लोकांनी सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. अनेक ठिकाणी सत्याग्रहींनी इंग्रजी मीठ उत्पादनावर बहिष्कार टाकला आणि आपल्या भूमीवरच मीठ तयार करण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आले, परंतु आंदोलकांनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. अमेरिकी पत्रकार वेब मिलर यांनी सत्याग्रहींवर झालेल्या इंग्रजांच्या अत्याचारांचे सत्य जगासमोर आणले. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला.

गांधी-आयर्विन करार आणि भारताच्या स्वातंत्र्याचा पाया

दांडी यात्रेच्या परिणामस्वरूप गांधीजी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करार झाला. या करारानुसार इंग्रजांनी सत्याग्रहींवरील अत्याचार थांबवण्याचे आश्वासन दिले आणि काही मागण्या मान्य केल्या. या चळवळीने ब्रिटिशांना भारतीयांना स्वायत्तता देण्यास भाग पाडले. १९३५ च्या भारत सरकार कायद्याच्या माध्यमातून काही प्रमाणात स्वायत्तता दिली गेली, मात्र अंतिम स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच राहिला. दांडी यात्रेच्या यशस्वीतेमुळेच गांधीजींनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू केले, ज्यामुळे अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

हे देखील वाचा : MBS चे वाळवंट असलेले नंदनवनच सौदीत विनाश घडवणार; ‘सिंकहोल’ बनणार, तज्ज्ञांचा मोठा इशारा

७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर दांडी यात्रेचे स्मरण

या ऐतिहासिक घटनेला ९४ वर्षे पूर्ण झाली असली, तरीही त्याचे महत्त्व आजही टिकून आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून याची विशेष आठवण ठेवली जात आहे. स्वातंत्र्यलढ्यातील या अभूतपूर्व घटनेच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दांडी यात्रा हा केवळ एका कायद्याचा विरोध नव्हता, तर भारतीय जनतेच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी केलेला निर्णायक संघर्ष होता. या ऐतिहासिक घटनेने भारताला स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली, याची आठवण आजही भारतीय नागरिकांना प्रेरणा देते.

Web Title: 94 years ago mahatma gandhis dandi march marked a key moment in indias freedom struggle nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • day history
  • freedom fighters
  • Mahatma Gandhi

संबंधित बातम्या

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा
1

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी
2

बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
3

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण ‘त्या’ घटनेमुळे राहिली अपूर्ण
4

Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण ‘त्या’ घटनेमुळे राहिली अपूर्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.