• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • 94 Years Ago Mahatma Gandhis Dandi March Marked A Key Moment In Indias Freedom Struggle Nrhp

महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला 94 वर्षे पूर्ण; भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा

१२ मार्च हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णदिन मानला जातो. याच दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या अन्यायकारक मीठ कायद्याला विरोध करण्यासाठी ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2025 | 09:17 AM
94 years ago Mahatma Gandhi's Dandi March marked a key moment in India's freedom struggle

महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला 94 वर्षे पूर्ण; भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली – १२ मार्च हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णदिन मानला जातो. याच दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या अन्यायकारक मीठ कायद्याला विरोध करण्यासाठी ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली होती. या आंदोलनामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी दिशा मिळाली आणि इंग्रज साम्राज्याच्या नीतीला आव्हान उभे करण्यात यश मिळाले.

दांडी यात्रा: सविनय कायदेभंग चळवळीचा महत्त्वपूर्ण अध्याय

१९३० मध्ये सुरू झालेली दांडी यात्रा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानली जाते. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहासाठी २४० मैल (३८६ किलोमीटर) अंतर पार करत गुजरातमधील दांडी या गावात पोहोचले. तिथे त्यांनी ६ एप्रिल रोजी समुद्रकिनारी मीठ तयार करून ब्रिटिशांच्या मीठ कायद्याचा भंग केला. या यात्रेत गांधीजींसोबत ७९ सत्याग्रही सहभागी झाले होते, मात्र जसजशी यात्रा पुढे सरकत गेली, तसतसे हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले. गांधीजी दररोज तब्बल १६ किलोमीटर चालत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील हे आंदोलन पूर्णतः अहिंसक होते.

हे देखील वाचा : अमेरिकेत सध्या ‘पेन’ बनले वादाचे कारण; फक्त एका लेखणीवरून उडाली खळबळ, वाचा यामागचे कारण

लोकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि स्वातंत्र्यलढ्याला मिळालेली गती

दांडी यात्रेने भारतभर स्वातंत्र्याची जाणीव अधिक दृढ केली. या आंदोलनाला देशभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आणि ब्रिटिश सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली. लाखो लोकांनी सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. अनेक ठिकाणी सत्याग्रहींनी इंग्रजी मीठ उत्पादनावर बहिष्कार टाकला आणि आपल्या भूमीवरच मीठ तयार करण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आले, परंतु आंदोलकांनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. अमेरिकी पत्रकार वेब मिलर यांनी सत्याग्रहींवर झालेल्या इंग्रजांच्या अत्याचारांचे सत्य जगासमोर आणले. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला.

गांधी-आयर्विन करार आणि भारताच्या स्वातंत्र्याचा पाया

दांडी यात्रेच्या परिणामस्वरूप गांधीजी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करार झाला. या करारानुसार इंग्रजांनी सत्याग्रहींवरील अत्याचार थांबवण्याचे आश्वासन दिले आणि काही मागण्या मान्य केल्या. या चळवळीने ब्रिटिशांना भारतीयांना स्वायत्तता देण्यास भाग पाडले. १९३५ च्या भारत सरकार कायद्याच्या माध्यमातून काही प्रमाणात स्वायत्तता दिली गेली, मात्र अंतिम स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच राहिला. दांडी यात्रेच्या यशस्वीतेमुळेच गांधीजींनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू केले, ज्यामुळे अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

हे देखील वाचा : MBS चे वाळवंट असलेले नंदनवनच सौदीत विनाश घडवणार; ‘सिंकहोल’ बनणार, तज्ज्ञांचा मोठा इशारा

७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर दांडी यात्रेचे स्मरण

या ऐतिहासिक घटनेला ९४ वर्षे पूर्ण झाली असली, तरीही त्याचे महत्त्व आजही टिकून आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून याची विशेष आठवण ठेवली जात आहे. स्वातंत्र्यलढ्यातील या अभूतपूर्व घटनेच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दांडी यात्रा हा केवळ एका कायद्याचा विरोध नव्हता, तर भारतीय जनतेच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी केलेला निर्णायक संघर्ष होता. या ऐतिहासिक घटनेने भारताला स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली, याची आठवण आजही भारतीय नागरिकांना प्रेरणा देते.

Web Title: 94 years ago mahatma gandhis dandi march marked a key moment in indias freedom struggle nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • day history
  • freedom fighters
  • Mahatma Gandhi

संबंधित बातम्या

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची
1

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची

World Lizard Day 2025 : सरड्यांच्या जगातील गुपित कथा! तुम्हाला माहित नसतील ‘अशा’ 5 अद्भुत गोष्टी
2

World Lizard Day 2025 : सरड्यांच्या जगातील गुपित कथा! तुम्हाला माहित नसतील ‘अशा’ 5 अद्भुत गोष्टी

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना
3

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना

Friendship Day 2025 : खूपच रंजक आहे मैत्री दिनाचा इतिहास; आयुष्यात चांगल्या मित्रांची गरज का असते? जाणून घ्या
4

Friendship Day 2025 : खूपच रंजक आहे मैत्री दिनाचा इतिहास; आयुष्यात चांगल्या मित्रांची गरज का असते? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.