• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar Was Not Only A Revolutionary But Also A Sensitive Writer

Swatantraveer Savarkar Jayanti Special: “ने मजसी ने परत मातृभूमीला”; ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर

निडर वृत्ती आणि ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचाराला बंड पुकारणारे सावरकर क्रांतिकारक असण्याबरोबरच संवेदनशील साहित्यिक देखील होते. देशाच्या परकीयांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांनी नाटकं आणि कविता लिखाण केलं होतं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 28, 2025 | 02:04 PM
"ने मजसी ने परत मातृभूमीला"; ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर

फोटो सौजन्य: गुगल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि या देशाचे आपण देणं लागतो”, हे वाक्य ऐकलं किंवा वाचलं की एक नाव आपसूकचं आठवतं, ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची आज 141वी जयंती. ब्रिटीशांचा जुलुम आणि गुलामी दिडशे वर्ष देशाने झेलला होता. या ब्रिटीशांच्या जाचाविरुद्ध अनेक क्रांतिकारकांनी बंड पुकारलं. केवळ बंड पुकारलंच नाही तर साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा अवलंब करत मातृभूमीचा उद्धार करण्यासाठी प्राणांची बाजी या क्रातिकारकांनी लावली आणि त्यातले एक नाव म्हणजे स्वातंत्र्यावीर सावरकर. मातृभूमीवरील अपार प्रेम आणि ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर.

अंंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा किंवा जन्मठेप सावकरांचं धाडस, प्राण हातावर घेऊन निडर लढण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर शस्त्रानिशी लढले खरे पण हे शस्त्र फक्त ब्रिटीशांना किंवा देशद्रोहींना रक्तबंबाळ करणारंच नव्हे, तर देशवासियांना आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या मातृभूमी वरील प्रेम जागृत करणारं देखील शस्त्र होतं आणि ते शस्त्र म्हणजे सावरकरांची लेखणी. सावरकरांचं देशाप्रति किती प्रेम होतं याची साक्ष सावरकरांचं वाड्मय देतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त क्रांतिकारकच नव्हते, तर ते वीरकवी देखील होते.

शब्दसंपदा, साहित्य यावर असलेलं सावरकरांचं प्रभुत्व, त्यांची देशाप्रतिची तळमळ, अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या लेखांमधून आजही वाचकांना भारावून टाकते. असं म्हटलं जातं कवी हा संवेदनशील असतो. या महाराष्ट्राला थोर पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे, तसाच साहित्याचा देखील वारसा लाभलेला आहे. जेव्हा अन्याय-अत्याचार होतात तेव्हा शब्द पेटून उठतात. संत तुकोबा असो किंवा ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांनीच आपल्या संतवाणीतून समाजातील अन्याय अत्याचाराविरोधातील चीड व्यक्त केली आहे. हीच वेदना हाच त्रागा सावरकरांच्या प्रत्येक कवितेतून अंगावर शहारे आणतात. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी या गुलामगिरीविरोधात सावरकरांनी ‘फटका’ हा काव्यप्रकार लिहिला. स्वत:चं अस्तित्व टिकवायचं असेल तर’ स्वदेशी’ वस्तू वापरायला पाहिजेत. हाच हेतू भारतीयांच्या मनात रुजवण्यासाठी सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली आणि स्वदेशी वस्तूंबाबत प्रत्येकाच्या मनात विचार पेरले. फटका या काव्यप्रकारात सावरकर म्हणाले की,

आर्यबंधु हो उठा उठा कां मठासारखे नटा सदा
हटा सोडूनी कटा करूं या म्लेंछपटां ना धरूं कदा
काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां
मलमल त्यजुनी वलवल चित्तीं हलहलके पट कां वरितां ?
राजमहेंद्री चीट त्यजोनी विटकें चिट तें का घेतां
दैवें मिळतां वाटि इच्छितां नरोटी नाहीं का आतां ?
नागपुरचें रेशिम भासे तागपटासें परि परक्या
रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागती तुम्हां कश्या ?
येवलि सोडून पितांबरांना विजार करण्या सटिन पहा

या फटक्यात सावरकर म्हणतात, स्वत:जवळ असलेल्या नैसर्गिक साधनांचा वापर आणि कलेचा वापर न करता का विदेशीचंं कोडकौतुक करता ? काश्मीरच्या मखमलीसारखं कापड आपल्याकडेे असताना आपण का म्हणून पाश्चिमात्य कापड्याला महत्त्व देता. मुर्ख माणसांनो, स्वदेशीच्या वस्तूंना तुम्हीच नाकारले तर गुलामगिरी तुम्हालाच गिळेल हे कसं तुम्हाला कळू नये, अशा पडखर शब्दात सावरकरांनी स्वदेशीचं महत्त्व वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सांगितलं होतं. ज्या कोवळ्या वयात विद्यार्थी शिक्षणाचा आधार घेत भविष्य गिरवत असतात त्याच वयात सावरकरांच्या मनात स्वातंत्र्याची बीजं रुजली होती. सावरकरांनी अनेक काव्य रचली त्या प्रत्येक काव्यात मातृभूमीचा उद्धार व्हावा हीच तळमळ व्यक्त होते.

इंग्रजांनी जेव्हा सावरकरांना अटक केली, तेव्हा आता आपण पुन्हा आपल्या मायदेशी जाऊ की नाही,हा प्रश्न सावरकरांपुढे उभा राहिला आणि त्या वेदनेतून जन्मलेले शब्द होते,

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं। सृष्टिची विविधता पाहूं मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन
तई जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
विश्वसलों या तव वचनीं। मी
जगदनुभव-योगे बनुनी। मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला। सागरा, प्राण तळमळला

देशप्रेमाने आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या या स्वातंंत्र्यावीराला नवराष्ट्रचा मानाचा सलाम!

 

(संदर्भ: सावरकरांची कविता या ऑनलाईन पुस्तकावर आधारित हा लेख लिहिण्यात आला आहे. )

Web Title: Freedom fighter vinayak damodar savarkar was not only a revolutionary but also a sensitive writer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • navrashtra news
  • SpecialDays
  • Swatantraveer Savarkar

संबंधित बातम्या

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
1

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज
2

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल
3

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Feb 15, 2026 | 06:15 AM
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.