• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar Was Not Only A Revolutionary But Also A Sensitive Writer

Swatantraveer Savarkar Jayanti Special: “ने मजसी ने परत मातृभूमीला”; ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर

निडर वृत्ती आणि ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचाराला बंड पुकारणारे सावरकर क्रांतिकारक असण्याबरोबरच संवेदनशील साहित्यिक देखील होते. देशाच्या परकीयांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांनी नाटकं आणि कविता लिखाण केलं होतं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 28, 2025 | 02:04 PM
"ने मजसी ने परत मातृभूमीला"; ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर

फोटो सौजन्य: गुगल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि या देशाचे आपण देणं लागतो”, हे वाक्य ऐकलं किंवा वाचलं की एक नाव आपसूकचं आठवतं, ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची आज 141वी जयंती. ब्रिटीशांचा जुलुम आणि गुलामी दिडशे वर्ष देशाने झेलला होता. या ब्रिटीशांच्या जाचाविरुद्ध अनेक क्रांतिकारकांनी बंड पुकारलं. केवळ बंड पुकारलंच नाही तर साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा अवलंब करत मातृभूमीचा उद्धार करण्यासाठी प्राणांची बाजी या क्रातिकारकांनी लावली आणि त्यातले एक नाव म्हणजे स्वातंत्र्यावीर सावरकर. मातृभूमीवरील अपार प्रेम आणि ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर.

अंंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा किंवा जन्मठेप सावकरांचं धाडस, प्राण हातावर घेऊन निडर लढण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर शस्त्रानिशी लढले खरे पण हे शस्त्र फक्त ब्रिटीशांना किंवा देशद्रोहींना रक्तबंबाळ करणारंच नव्हे, तर देशवासियांना आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या मातृभूमी वरील प्रेम जागृत करणारं देखील शस्त्र होतं आणि ते शस्त्र म्हणजे सावरकरांची लेखणी. सावरकरांचं देशाप्रति किती प्रेम होतं याची साक्ष सावरकरांचं वाड्मय देतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त क्रांतिकारकच नव्हते, तर ते वीरकवी देखील होते.

शब्दसंपदा, साहित्य यावर असलेलं सावरकरांचं प्रभुत्व, त्यांची देशाप्रतिची तळमळ, अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या लेखांमधून आजही वाचकांना भारावून टाकते. असं म्हटलं जातं कवी हा संवेदनशील असतो. या महाराष्ट्राला थोर पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे, तसाच साहित्याचा देखील वारसा लाभलेला आहे. जेव्हा अन्याय-अत्याचार होतात तेव्हा शब्द पेटून उठतात. संत तुकोबा असो किंवा ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांनीच आपल्या संतवाणीतून समाजातील अन्याय अत्याचाराविरोधातील चीड व्यक्त केली आहे. हीच वेदना हाच त्रागा सावरकरांच्या प्रत्येक कवितेतून अंगावर शहारे आणतात. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी या गुलामगिरीविरोधात सावरकरांनी ‘फटका’ हा काव्यप्रकार लिहिला. स्वत:चं अस्तित्व टिकवायचं असेल तर’ स्वदेशी’ वस्तू वापरायला पाहिजेत. हाच हेतू भारतीयांच्या मनात रुजवण्यासाठी सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली आणि स्वदेशी वस्तूंबाबत प्रत्येकाच्या मनात विचार पेरले. फटका या काव्यप्रकारात सावरकर म्हणाले की,

आर्यबंधु हो उठा उठा कां मठासारखे नटा सदा
हटा सोडूनी कटा करूं या म्लेंछपटां ना धरूं कदा
काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां
मलमल त्यजुनी वलवल चित्तीं हलहलके पट कां वरितां ?
राजमहेंद्री चीट त्यजोनी विटकें चिट तें का घेतां
दैवें मिळतां वाटि इच्छितां नरोटी नाहीं का आतां ?
नागपुरचें रेशिम भासे तागपटासें परि परक्या
रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागती तुम्हां कश्या ?
येवलि सोडून पितांबरांना विजार करण्या सटिन पहा

या फटक्यात सावरकर म्हणतात, स्वत:जवळ असलेल्या नैसर्गिक साधनांचा वापर आणि कलेचा वापर न करता का विदेशीचंं कोडकौतुक करता ? काश्मीरच्या मखमलीसारखं कापड आपल्याकडेे असताना आपण का म्हणून पाश्चिमात्य कापड्याला महत्त्व देता. मुर्ख माणसांनो, स्वदेशीच्या वस्तूंना तुम्हीच नाकारले तर गुलामगिरी तुम्हालाच गिळेल हे कसं तुम्हाला कळू नये, अशा पडखर शब्दात सावरकरांनी स्वदेशीचं महत्त्व वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सांगितलं होतं. ज्या कोवळ्या वयात विद्यार्थी शिक्षणाचा आधार घेत भविष्य गिरवत असतात त्याच वयात सावरकरांच्या मनात स्वातंत्र्याची बीजं रुजली होती. सावरकरांनी अनेक काव्य रचली त्या प्रत्येक काव्यात मातृभूमीचा उद्धार व्हावा हीच तळमळ व्यक्त होते.

इंग्रजांनी जेव्हा सावरकरांना अटक केली, तेव्हा आता आपण पुन्हा आपल्या मायदेशी जाऊ की नाही,हा प्रश्न सावरकरांपुढे उभा राहिला आणि त्या वेदनेतून जन्मलेले शब्द होते,

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं। सृष्टिची विविधता पाहूं मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन
तई जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
विश्वसलों या तव वचनीं। मी
जगदनुभव-योगे बनुनी। मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला। सागरा, प्राण तळमळला

देशप्रेमाने आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या या स्वातंंत्र्यावीराला नवराष्ट्रचा मानाचा सलाम!

 

(संदर्भ: सावरकरांची कविता या ऑनलाईन पुस्तकावर आधारित हा लेख लिहिण्यात आला आहे. )

Web Title: Freedom fighter vinayak damodar savarkar was not only a revolutionary but also a sensitive writer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • navrashtra news
  • SpecialDays
  • Swatantraveer Savarkar

संबंधित बातम्या

Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल
1

Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल

Diploma in Instrumentation : क्षेत्रात करायचे आहे करिअर? मग जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर
2

Diploma in Instrumentation : क्षेत्रात करायचे आहे करिअर? मग जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Dec 29, 2025 | 12:30 AM
दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड

दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड

Dec 28, 2025 | 11:20 PM
Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Dec 28, 2025 | 09:35 PM
Lalbaug Parel Movie: “त्याला घरात घुसून मारणार…” महेश मांजरेकरबद्दल हे काय वक्त्यव्य करून गेले? काय आहे नेमका वाद?

Lalbaug Parel Movie: “त्याला घरात घुसून मारणार…” महेश मांजरेकरबद्दल हे काय वक्त्यव्य करून गेले? काय आहे नेमका वाद?

Dec 28, 2025 | 09:34 PM
Hero Splendor की TVS Radeon, दोन्ही बाईक खिशाला परवडणाऱ्या मात्र फीचर्स, इंजिन आणि मायलेजमध्ये बेस्ट कोण?

Hero Splendor की TVS Radeon, दोन्ही बाईक खिशाला परवडणाऱ्या मात्र फीचर्स, इंजिन आणि मायलेजमध्ये बेस्ट कोण?

Dec 28, 2025 | 09:18 PM
TVS च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतले डोक्यावर! विक्रीत थेट 140 टक्क्यांची सुसाट वाढ

TVS च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतले डोक्यावर! विक्रीत थेट 140 टक्क्यांची सुसाट वाढ

Dec 28, 2025 | 08:44 PM
Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Dec 28, 2025 | 08:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.