• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Positive Thinking Day Change Your Mind Change Your Life

Positive Thinking Day : प्रत्येक नवा दिवस नवीन विचारांसोबत जगा, जीवन बदलायचे तर आधी मन बदला

Positive Thinking Day : जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वाईट काळ बदलायचा असेल तर सर्वप्रथम तुमचे मन स्थिर, शांत आणि सकारात्मक बनवा, कारण तुमच्या जीवनाची दिशा तुमच्या मनाच्या स्थितीवरून ठरते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 13, 2025 | 10:50 AM
Positive Thinking Day Change your mind change your life

Positive Thinking Day : प्रत्येक नवा दिवस नवीन विचारांसोबत जागा, जीवन बदलायचे तर आधी मन बदला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जीवनातील बदल मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो.

  • अंतर्गत शांतता मिळाल्यावरच बाह्य जग अनुकूल वाटते.

  • ज्योतिषीय उपाय तेव्हाच फलदायी ठरतात जेव्हा मन सकारात्मक आणि शंका-मुक्त असते.

Positive Thinking Day : आपण दररोजच्या आयुष्यात बघतो की अनेकदा परिस्थिती आपल्या विरोधात जाते. नाती तुटतात, संधी हुकतात, निर्णय चुकीचे होतात आणि मन अस्वस्थ राहते. अशावेळी आपल्याला वाटते की नशिबच आपल्या बाजूने नाही. पण खरे म्हणजे, जीवनाची दिशा ही आपल्या मनाच्या स्थितीवरून ठरते. मन अस्वस्थ असेल तर काळही प्रतिकूल वाटतो, आणि मन शांत असेल तर कठीण परिस्थितीही सोपी होते.

 आतून बदलल्याशिवाय बाहेरचे जग बदलत नाही

एक साधी गोष्ट लक्षात ठेवावी लागते आरसा कधीच चेहरा बदलत नाही, तर चेहरा सुधारला की आरशातली प्रतिमा बदलते. हेच आपल्या जीवनालाही लागू पडते. आपण जगाला दोष देतो, पण जोपर्यंत आपण आतून बदल करत नाही, तोपर्यंत बाहेर काहीच बदलत नाही. एक व्यक्ती नेहमी तक्रार करायचा की लोक खूप स्वार्थी आहेत, नाती रिकामी झाली आहेत आणि नशीब साथ देत नाही. पण एका ऋषींनी त्याला सांगितले “आरशाला शाप दिल्याने चेहरा सुंदर होत नाही. स्वतःला सुधारा, मग जगही सुंदर दिसेल.” ही शिकवण त्याने आत्मसात केली आणि आयुष्य खरंच बदलले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड

 ज्योतिषशास्त्र आणि मनाची स्थिती

अनेकांना वाटते की ग्रहदशा, कुंडली, गोचरच आपले भाग्य ठरवतात. पण सत्य थोडे वेगळे आहे. ग्रहांचे योग अनुकूल असले तरी जर मन नकारात्मक आणि शंकांनी भरलेले असेल तर त्याचा फायदा होत नाही. उलटपक्षी, मन स्थिर आणि सकारात्मक असेल तर ग्रहांची ऊर्जा देखील साथ देते. ज्योतिषशास्त्रातील संशोधनही हेच सांगते की बाह्य परिस्थिती ही आपल्या विचारसरणी, भावना आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. म्हणून पूजा, पाठ, ग्रहशांती करताना केवळ विधीवर भर न देता मनाची अवस्था लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

 Positive Thinking Day चे खरे महत्त्व

आज ‘Positive Thinking Day’ आहे. याचा अर्थ केवळ सकारात्मक विचार करणे इतकाच नाही, तर मन शांत ठेवणे, स्वतःकडे डोकावणे आणि जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहणे. जेव्हा आपण आतून गुंतलेले असतो तेव्हा बाहेरचे जगही गोंधळलेले वाटते. पण एकदा मन स्पष्ट झाले की नाती सुधारतात, निर्णय चांगले होतात आणि संधी आपोआप मिळू लागतात. कोणीतरी खूप छान म्हटले आहे “वेळ फक्त घड्याळात फिरत नाही, वेळ मनातही फिरते.” त्यामुळे आपला वेळ बदलायचा असेल, तर मनाची दिशा बदलावी लागते.

Positive Thinking Day Change your mind change your life

Positive Thinking Day : जीवन बदलायचे असेल तर आधी मन बदला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

 आतला प्रकाश पेटवा

जीवनातील अंधार घालवायचा असेल तर बाहेर शोधण्याऐवजी आतला दिवा पेटवणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण आतून बदलत नाही, तोपर्यंत बाहेरचे जगही तसेच राहते. मनातला प्रकाश वाढला की बाहेरचाही अंधार आपोआप नाहीसा होतो. म्हणून आजच्या दिवशी एक ठाम संकल्प करूया आपण आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि दृष्टीकोनात सकारात्मकता आणू. यामुळे केवळ आपले आयुष्यच नव्हे तर आपल्या आसपासचे वातावरण देखील बदलून जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Political Unrest : आंदोलनानंतर नेपाळ पोलिस का शोधत आहेत या 12500 लोकांना? वाचा सविस्तर…

Positive Thinking Day

Positive Thinking Day ही केवळ एक दिनविशेषाची आठवण नाही, तर मनाच्या शक्तीची जाणीव करून देणारा दिवस आहे. जीवन बदलायचे असेल तर सुरुवात बाहेरून नाही, आतून करावी लागते. एकदा मन बदलले की, परिस्थिती बदलते, लोक बदलतात, नाती सुधरतात आणि नशीबही साथ द्यायला लागते.

Web Title: Positive thinking day change your mind change your life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Be Positive
  • Happy Lifestyle
  • human mind
  • lifestyle news
  • Peace of Mind

संबंधित बातम्या

तेलाने काळीकुट्ट-चिकट झालेली कढई एका मिनिटांतच होईल नव्यासारखी चकचकीत; पैसेही खर्च कारण्याची गरज नाही, घरगुती टिप्सचा करा वापर
1

तेलाने काळीकुट्ट-चिकट झालेली कढई एका मिनिटांतच होईल नव्यासारखी चकचकीत; पैसेही खर्च कारण्याची गरज नाही, घरगुती टिप्सचा करा वापर

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण
2

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

वाईट आठवणी पुसून टाकण्यासाठी मानसशास्त्रात सांगितलाय नवा मार्ग ‘याने’ नक्कीच मिळेल मन:शांती
3

वाईट आठवणी पुसून टाकण्यासाठी मानसशास्त्रात सांगितलाय नवा मार्ग ‘याने’ नक्कीच मिळेल मन:शांती

केवळ सौंदर्यच नाही तर निरोगीआरोग्यासाठी आहेत मेहंदीचे फायदे, काय सांगत आयुर्वेद, जाणून घ्या
4

केवळ सौंदर्यच नाही तर निरोगीआरोग्यासाठी आहेत मेहंदीचे फायदे, काय सांगत आयुर्वेद, जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Positive Thinking Day : प्रत्येक नवा दिवस नवीन विचारांसोबत जगा, जीवन बदलायचे तर आधी मन बदला

Positive Thinking Day : प्रत्येक नवा दिवस नवीन विचारांसोबत जगा, जीवन बदलायचे तर आधी मन बदला

Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान

पितृपक्षातील श्राद्धच्या जेवणात आवर्जून बनवले जातात ‘हे’ पदार्थ, पारंपरिक चवीचे पौष्टिक पदार्थ

पितृपक्षातील श्राद्धच्या जेवणात आवर्जून बनवले जातात ‘हे’ पदार्थ, पारंपरिक चवीचे पौष्टिक पदार्थ

Shinde-Fadnavis Controversy : शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी; नेमकं काय आहे कारण?

Shinde-Fadnavis Controversy : शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी; नेमकं काय आहे कारण?

‘मी गांभीर्याने घेत नाहीये…’ दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, वडील जगदीश पटानी यांचे समोर आले विधान

‘मी गांभीर्याने घेत नाहीये…’ दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, वडील जगदीश पटानी यांचे समोर आले विधान

Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या

Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Navi Mumbai :  मनपा अधिकारी सत्ताधाऱ्यांना हवी तशीच प्रभाग रचना करत आहेत, मनसेचा आरोप

Navi Mumbai : मनपा अधिकारी सत्ताधाऱ्यांना हवी तशीच प्रभाग रचना करत आहेत, मनसेचा आरोप

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.