बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी सामना पार पडला. कालच्या सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला आहे. बांग्लादेशने विजय मिळवून इतिहास रचला आहे, त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला. बांग्लादेशच्या संघाने कर्णधार नजमुल शांतोच्या नेतृत्वाखालील संघात जल्लोषाचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे आता जगभरामध्ये बांग्लादेशच्या संघाची वाहवाह केली जात आहे. परंतु पराभूत झालेला पाकिस्तानच्या संघामध्ये निराशाजनक वातावरण नक्कीच आहे. पण आता पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवामुळे शाहिद आफ्रिदी संतापला आहे.
पाकिस्तानचा बांग्लादेशविरुद्ध पराभव झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, 10 विकेट्सच्या पराभवामुळे अशा प्रकारची खेळपट्टी तयार करणे, चार वेगवान गोलंदाजांची निवड करणे आणि तज्ञ फिरकीपटूला वगळणे या निर्णयावर गंभीर प्रश्न निर्माण होतात. हे माझ्यासाठी घरच्या परिस्थितीबद्दल जागरूकतेचा अभाव स्पष्टपणे दर्शवते. ते म्हणाले की, बांगलादेशने संपूर्ण कसोटीत खेळलेल्या क्रिकेटच्या ब्रँडचे श्रेय तुम्ही त्यांच्याकडून काढून घेऊ शकत नाही.
A 10-wicket defeat raises serious questions about the decision to prepare this type of pitch, select four fast bowlers and leave out a specialist spinner. This to me clearly shows a lack of awareness about home conditions. That said, you cannot take the credit away from…
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) August 25, 2024
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्याची मालिका पार पडणार आहे. यामध्ये पहिला कसोटी सामना पार पडला. यामध्ये बांग्लादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हिल्या दिवशी पावसामुळे ९० षटकांचा खेळ झाला नाही. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच ४४८ धावांवर डाव घोषित केला. शाहिद आफ्रिदीचा मुद्दाही योग्य वाटतो कारण खेळपट्टीचे योग्य मूल्यांकन केले असते तर पाकिस्तानने पहिल्या डावात ५०० किंवा ५५० धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पाकिस्तानच्या ४४८ धावांना प्रत्युत्तर देताना बांग्लादेशने सर्वांना चकित केले आणि ५६५ धावा केल्या. डाव घोषित करण्याच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तान संघाच्या पराभवाचा पाया रचला होता.