( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kamali Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मध्ये आता प्रेक्षकांना मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कमळीची आई हे जग सोडून गेली असा गैरसमज अनेकांना होता. पण एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा गौरी सुखरूप वाचली. मात्र, तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने कमळीच्या आईची स्मृती गेली आहे. कमळीच्या बालपणाबद्दल तिला सगळं माहिती असतं. पण, तिच्या लेकीला ती प्रत्यक्ष ओळखूही शकत नाही. गौरीला खूप मोठा मानसिक धक्का बसला असून आता आईची जबाबदारी कमळीवर असते.
कमळी सुद्धा आईची सेवा अगदी मनापासून करते आहे. या सगळ्या परिस्थितीत ह्रषी, निंगी तिच्या पाठिशी खंबीर उभे आहेत. पण, आता कमळीला त्रास देण्यासाठी अनिका पुन्हा एकदा एक प्लॅन रचणार आहे. मुलींच्या हॉस्टेमध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे कमळीच्या रूममध्ये तिच्या घरातले राहू शकत नाहीत. त्यामुळे कमळीने हॉस्टेलचे नियम मोडले आहेत. असा दावा अनिकाने केला आहे.
हॉस्टलचे नियम मोडल्याने कमळीला तिची राहती जागा सोडावी लागणार आहे. मुंबईत कमळीच्या ओळखीचं कोणीच नसतं. अशा परिस्थितीत कमळी, तिची आई आणि निंगी कुठे जाणार हा प्रश्न सर्वांना पडतो. आता कमळी कायमची गावी जाणार अशा भ्रमात अनिका असू शकते. पण, आता ह्रषी स्वत: पुढाकार घेऊन यातून मार्ग काढणार आहे.
View this post on Instagram
झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात दिसत आहे. कमळीला हॉस्टेलमधून बाहेर काढल्यानंतर ह्रषी या तिघींना घेऊन त्याच्या स्वत:च्या घरी जातो. कमळीला पाहून नयनतारा म्हणते, “हे काय? मी फक्त तुला घरी बोलावलं होतं.” त्यावर हृषी ठामपणे उत्तर देतो, “आई, अगदी काही दिवसांचा प्रश्न आहे. आता याला अट समजायची असेल तर तसं समज… पण जर मी तुला या घरात यायला हवा असेन, तर तुला कमळीला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी या घरात घ्यावं लागेल.”
हृषीच्या या स्पष्ट भूमिकेमुळे नयनतारासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मुलाच्या आग्रहाखातर ती कमळी आणि तिच्या आईला घरात स्थान देणार की आपला निर्णय बदलणार नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर कमळीच्या आईची हरवलेली स्मृती पुन्हा परत येणार का, याबाबतची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.






