इंग्लंड पुरुष क्रिकेट संघ(फोटो-सोशल मीडिया)
Misconduct of England cricketers during the Ashes series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्ट सुट्टीत जास्त मद्यपान केल्याच्या वृत्तानंतर इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी इंग्लंड संघाच्या मद्यपानाची चौकशी करण्याचे म्हटले आहे. सध्याच्या मालिकेत इंग्लंडची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली असून त्यांनी तिन्ही कसोटी सामने गमावले आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला अॅशेस राखता आली आहे. गेल्या १८ सामन्यांमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
इंग्लंडने २०१०-११ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. इंग्लंडच्या संघाने २०१०-११ मध्ये ऑस्ट्रेलियात शेवटची मालिका जिंकली होती. मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असताना, संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातील विश्रांती दरम्यान ब्रिस्बेनच्या उत्तरेकडील नूसा शहरातील एका रिसॉर्टमध्ये चार रात्री घालवल्या. हा त्यांच्या कार्यक्रमाचा एक भाग होता. रॉब की यांनी सांगितले की त्यांना ब्रेकबाबत कोणतीही अडचण नव्हती, परंतु अतिरेकी मद्यपानाचे पुरावे आढळल्यास ते चौकशी करतील. ते म्हणाले, “जर आमच्या खेळाडूंनी जास्त मद्यपान केल्याचे उघड झाले तर आम्ही निश्चितच चौकशी करू. ते अस्वीकार्य आहे.” रॉब की म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाने जास्त प्रमाणात मद्यपान करावे अशी मी कधीही अपेक्षा करणार नाही आणि जे घडले त्याची चौकशी केली नाही तर ती चूक ठरेल.”
दीर्घ विश्रांतीनंतर विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये परतला आहे. या स्टार भारतीय खेळाडूने आता खास टप्पा गाठला आहे. २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळत असलेल्या विराट कोहलीने मैदानावर उतरताच इतिहास घडवला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर फलंदाजीसाठी येत असताना, त्याने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण केल्या आहेत. लीस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण करताच विराट कोहली हा टप्पा गाठणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा होता, ज्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१,९९९ धावा फटकावण्याची किमया साधली आहे.






