फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
Jasprit Bumrah injury update : भारताचा संघ उद्या म्हणजेच ९ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळणार आहे. यासाठी भारताचा संघ तयारी करत आहे. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे की या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा महत्वाचा खेळाडू जसप्रीत बुमराह हा संघाचा भाग नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने गेल्या सामन्यात गोलंदाजीही केली नव्हती. त्यानंतर बुमराहला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर राहावे लागले.
आता लवकरच आयपीएल २०२५ चा शुभारंभ होणार आहे, त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारतीय खेळाडू त्याचबरोबर विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. आता त्याच्या आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा ताण थोडा वाढू शकतो. बुमराह सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५ च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात खेळू शकत नाही. म्हणजे तोपर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होणार नाही. बुमराह बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
🚨Jasprit Bumrah may miss first two weeks of #IPL2025 🚨
-Likely to Join MI Camp only in April
-Medical report are Okay
-still hasn’t started bowling full tilt
-Likely to miss first three or Four Matches for MI
(TOI) pic.twitter.com/49ZlDU553D
— Rohit Baliyan (@rohit_balyan) March 8, 2025
बुमराहचा वैद्यकीय अहवाल ठीक आहे. त्याने COE मध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे. तथापि, पुढील दोन आठवड्यांत आयपीएलच्या सुरुवातीला तो गोलंदाजी करू शकेल अशी शक्यता कमी आहे. बुमराह एमआयसाठी पहिले तीन किंवा चार सामने गमावण्याची शक्यता आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, “वैद्यकीय पथक हळूहळू त्याच्या कामाचा ताण आणि तीव्रता वाढवेल. “काही दिवस तो कोणत्याही अस्वस्थतेशिवाय पूर्ण वेगाने गोलंदाजी करू शकत नाही तोपर्यंत त्याला वैद्यकीय पथकाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.”
🚨 BAD NEWS FOR MUMBAI INDIANS & FANS 🚨
– Jasprit Bumrah may miss the first two weeks of IPL 2025. (Arani Basu/TOI). pic.twitter.com/1TQXFTTkff
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 8, 2025
भारताचा संघ काही तासांमध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारताच्या संघाने ज्याप्रकारे या स्पर्धेमध्ये कामगिरी केली ते नक्कीच कौतुकास्पद आहे. भारताचा संघ या स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे.