India Pakistan War: ड्रोन हल्ल्यांदरम्यान स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दिला जातोय सल्ला! व्हायरल दावा योग्य की अयोग्य
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सुरु असलेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या वाढत्या तणावादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp, Instagram आणि Facebook वर अनेक दावे केले जात आहेत. सोशल मीडियावरील काही दावे इतके व्हायरल झाले आहेत, की लोकं या दाव्यांना खरे मानत आहेत. अशाच एका व्हायरल झालेल्या दाव्याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की टळणार? AI ने दिलं धक्कादायक उत्तर! म्हणाला, युद्ध झालं तर…
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा केला जात आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या या संघर्षादरम्यान तुमच्या स्मार्टफोनची लोकेशन सेवा बंद ठेवा. या लोकेशन सर्विसमुळे पाकिस्तान सर्वाधिक लोकं असलेल्या क्षेत्रांना टार्गेट करत आहे. हा दावा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र आता हा दावा खोटा असल्याचं PIB Fact Check ने सांगितलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित एक पोस्ट देखील शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
PIB Fact Check ने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. पीआयबीने म्हटलं आहे की, सरकारद्वारे फोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याची कोणतीही अॅडवाइजरी जारी करण्यात आली नाही. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेऊ नका.
A viral image is claiming that an advisory has been issued, advising people to turn off location services on their phones immediately.#PIBFactCheck
– This claim is FAKE
– No such advisory has been issued by the GoI pic.twitter.com/8GmYpKXTkJ
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2025
PIB Fact Check ने व्हायरल मेसेजचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, यामध्ये असं सांगितलं आहे की, अधिकृत ईमेलवर एक महत्त्वाचा सल्ला शेअर करण्यात आला आहे. मेलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तुमच्या स्मार्टफोनची लोकेशन सर्विस ताबडतोब बंद करा. ईमेलमध्ये असे सांगण्यात आले आहे की फोनच्या लोकेशन सर्विसवरून सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र ओळखण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. या ठिकाणी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद करा.
PIB Fact Check ने म्हटलं आहे की, भारत सरकरकडून अशा प्रकारची कोणतीही अॅडव्हायझरी जारी करण्यात आली नाही. हा पाकिस्तानकडून केला जाणार प्रचार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने लोकांना पाकिस्तानकडून शेअर केल्या जाणाऱ्या फेक न्यूजबाबत अलर्ट दिला होता. सरकारने लोकांना यापूर्वी देखील सांगितलं होतं की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. सरकारने आता पुन्हा भारतीय नागरिकांना आवाहन केलं आहे, की सोशल मीडियावरील फेक मेसेजपासून दूर राहा.
In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda.
It’s crucial to scrutinize every piece of information carefully.
If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation,… pic.twitter.com/YomXZUKmpH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2025
तुम्हाला सोशल मीडियावर एखादी फेक पोस्ट किंवा संशयास्पद कंटेट पाहायला मिळाला, जो भारतीय सशस्त्र दलाशी संबंधित आहे किंवा सध्याच्या भारत आणि पाकिस्तानच्या हल्ल्यांशी संबंधित असेल तर त्याबाबत त्वरीत रिपोर्ट करा. तुम्ही #PIBFactCheck वर हा रिपोर्ट करू शकता.