मुंबई हाय कोर्टाने देखील लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारला फटकारले आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
"परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही?" बॉम्बे हायकोर्टाने वाहतूक नियम मोडणाऱ्या भारतीयांना खडे बोल सुनावले आहेत. रस्ता अपघातातील नुकसान भरपाई वाढवताना कोर्टाने ही महत्त्वाची टिप्पणी केली.
शिक्षण अधिका-यांनी दिलेला नकार आदेश न्यायालयाने रद्द केला. शाळेला मुलीच्या नावात आईचे नाव समाविष्ट करण्याचे आणि जात मराठा ऐवजी अनुसूबित जाती-महार अशी नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाने मनपा आयुक्त आणि मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांना २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Muslim Reservation: मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ९ डिसेंबर २०१६ रोजी, ५ वर्षांची पीडित मुलगी पाणी आणण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी गेली असता आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पोलिसांनी यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून आहे.
मुंबई आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना शेवटचा इशारा दिला आहे. प्रदूषण कमी न झाल्यास नोकरशहांचे वेतन रोखण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायवैद्यक अहवालात अमली पदार्थ नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थांच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्याची केलेली विनंती विशेष एनडीपीएस न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
ऐन निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीची मोठा धक्का अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगिती मुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Manikrao Kokate: नाशिक घर वाटप घोटाळा प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
High Court on Tapovan tree felling : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये 1800 झाडांची कत्तल करण्यात येणार होती. तपोवनातील या वृक्षतोडीवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: औरंगाबाद खंडपीठाने चिनी मांजाने तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली. 'घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?', असा संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
राज्यात सध्या जवळपास १८ हजार १०६ कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या हजारोच्या घरात असून, या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त ठरण्याची दाट शक्यता आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतसाठी काही काळ मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृ्त्यूमुळे मनोरंजन विश्व हादरून गेले होते. याचदरम्यान आता मुंबई कोर्टात महत्त्वाचा निर्णय देण्यात आला.
खराब रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील धूळ आणि लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या मांडून ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले की, सामान्य माणसांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन खड्डेमय रस्त्यांमुळे होत आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. मात्र न्यायालयाने दणका दिल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला आहे.
पीडित मुलीच्या भावाच्या मित्राने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. ज्यामुळे गर्भधारणा झाली. जेव्हा हे उघड झाले तेव्हा ती २७ आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती होती.