मुंबईकरांसाठी वर्षाखेर आनंदाची! ३१ डिसेंबरपासून मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव) आणि २-बी चे निवडक टप्पे सुरू होणार आहेत. प्रवासाचा वेळ वाचणार आणि वाहतूक कोंडी फुटणार.
मुंबईतील दोन मोठ्या उपनगरांना जोडणारा ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत शक्य होणार आहे.
मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला अखेर आज सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून मुंबई ते ठाणे प्रवास आता फक्त २५ मिनिटांत करणे सोपे होणार आहे. छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे बांधकामाला सुरुवात करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 9 आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-अंधेरी मेट्रो 7A प्रकल्पांसाठी पहिला मेट्रो कारशेड प्रकल्प भाईंदरमधील राय गावात बांधण्याची योजना होती. मात्र आता रद्द करण्यात आले.
डोंबिवलीतील ठाणे-ठाकुर्ली उन्नत उड्डाणपूल प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून रखडलेला होता. आता लवकरच या उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा…
वाटप केलेल्या भूखंडांमध्ये १.५% फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) आणि १५% व्यावसायिक घटक आहे, जो बाधित व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा विकासकांद्वारे विकसित करू शकतात.
मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंकला वीर सावरकर सी लिंक असे नाव देण्यात आले आहे. हा पूल मुंबईतील कोस्टल रोड फेज ३ किंवा वेस्टर्न कोस्टल रोडचा भाग म्हणून बांधला जात आहे.
मुंबईत आणखी एक मेट्रो लाईन सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही मेट्रो सुरू होणार होती, परंतु अपूर्ण कामामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले.
बहुचर्चित मेट्रो ३ पूर्ण झाल्यानंतर पश्चिम मुंबईत उत्तर-दक्षिण जोडणी दृश्यमान झाली आहे. हा मार्ग पूर्ण झाला आहे, जो प्रवाशांना मेट्रो अंडरग्राउंडद्वारे थेट दक्षिण टोकावर घेऊन जाणार आहे.
वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाड आणि ऑपरेशनल समस्यांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडीची समस्या आता वाढती डोकेदुखी ठरत आहे. याचपार्श्वभूमीवर परिसरातील रस्ता रुंदीकरणा प्रकल्प हाती घेण्यात येत होता, मात्र या रुंदीकरणास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे असून त्या अनुषंगाने एमएमआरडीएने आपल्या नियमावली मध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे.
मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDA कडून ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी १९ महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी मिळाली आहे.
कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी झालेल्या MMRDA बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मेट्रो लाईन 5, 12 आणि 14 चे विस्तारीकरणही निश्चित करण्यात आले आहे.
Badlapur to Kanjurmarg Metro Line 14 : बदलापूर ते कांजूरमार्ग या देशातील सर्वात लांब मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाद्वारे शहराच्या मध्यभागी फक्त एका तासात पोहोचणे शक्य होणार…
मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटीकडून देशातील सर्वात मोठा सामंजस्य करार झाला. एकाच वेळी 4 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बदलापूर, अंबरनाथ या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक मुंबई-ठाण्यात लोकलने प्रवास करत असतात. लोकलमधील रेटारेटी, गर्दीला कंटाळलेल्या प्रवाशांना आता दिलासा देणारी बातमी आहे.