पनवेल महापालिकेच्या फडके नाट्यगृहात सकाळी ११ वाजता १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.
ओडिशामध्ये चेटकीण प्रथेच्या घटनांमध्ये घट होत नसल्याने मानवाधिकार आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. विद्यमान कायदा अपुरा ठरत असल्याचे नमूद करत, ‘चेटकीण’ हा शब्द वापरणेच फौजदारी गुन्हा ठरवावा, अशी महत्त्वाची शिफारस…
रोहा तालुक्यातील दुर्गम भागात येणाऱ्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की दैनंदिन प्रवास नाहक त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो खड्डेमुक्त व सुरक्षित करण्यात यावा, अशी जोरदार…
ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.
मसाळा तुकूमला अजूनही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होत चाललेली आहे.
अलिबाग तालुक्यात रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम लढती स्पष्ट झाल्या आहेत. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
काही प्लास्टिक पिशव्या अत्यंत पातळ असतात, ज्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करताना अनेक अडचणी येतात. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो.
डिजिटल आणि ऑनलाइन युगात प्रवेश करूनही आजही सामान्य ग्राहकांना बँकिंग कामांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सामान्य ग्राहक रांगेत अडकलेले असताना दुसरीकडे श्रीमंत व व्यावसायिकांचे व्यवहार मागील दाराने होत…
म्हळसा तालुक्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाच्या निवडणूकीत गुणवत्तेला संधी दिली जाणार की पैशांचा जोर पाहायला मिळणार, अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. म्हळसा तालुका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले…
फार्मर आयडी अनिवार्य केल्यामुळे आयडी नसलेल्या शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. सातबारा संगणकीकरण अपूर्ण आणि आधार लिंक नसल्याने महाडीबीटीवर नोंदणीच अडत आहे.
बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर असून याबाबत आता स्वतः परिवहन विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
२०२५ मधील दररोजचे सरासरी तापमान पूर्वीच्या सामान्य मर्यादेपेक्षा जास्तच राहिले. २०२५ मध्ये एकही दिवस २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढीचा नव्हता. २०२५ मध्ये जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या अत्यंत जवळ पोहोचली.
कझागिस्तानध्ये नवभारत नवराष्ट्रचे खास इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट भरले होते आणि यावेळी अमृता फडणवीस यांचीही उपस्थिती लाभली. भारत कसा प्रगती करत आहे याबाबत यावेळी चर्चा झाली
Maharashtra 1st Conclave 2025: १७ ऑगस्टपर्यंत तुमचे प्रश्न पाठवा आणि MH पहिल्या कॉन्क्लेव्ह २०२५ चा भाग व्हा. मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांकडून थेट उत्तरे मिळवा आणि महाराष्ट्राची दिशा बदलण्यात योगदान द्या!
"प्रश्न महाराष्ट्राचा" यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मिळवा. MH 1st Conclave 2025 यामध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५...
Navabharat Navarashtra Governance Award 2025 : नवभारत प्रकाशन समूहच्या वतीने गव्हर्नन्स क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील यशस्वी सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
Maharashtra Monsoon Update: २० मे रोजी मुंबईत मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाट पाहायला मिळाला. कर्नाटक किनाऱ्यावर चक्रीवादळ तयार होत असल्याने २१ ते २४ मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Ryugyong Hotel Facts: 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या Ryugyong Hotel ने उंचीचे रेकॉर्ड तोडले नाही पण जगभरात आपली छाप पाडण्यात यश मिळवले, मात्र शापित हॉटेल असं याला म्हटलं जातं
आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीची कामे शेतकरी शेतामध्ये करताना दिसून येत आहे. शेतात शेण खत टाकून पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यानंतर पिके येण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे.
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिघांनी घरात घुसून शिवीगाळ केली. तसेच तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल…