चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरवरील सुरू असलेल्या कामांमुळे वसई-विरार परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कुंभार्ली येथे के जी एन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या रोमांचक स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघाने दमदार खेळ करत आई महाकाली संघावर मात करून विजेतेपद…
Mira-Bhayandar मधील भाईंदर परिसरात घडलेल्या बिबट्या शिरकावाच्या घटनेनंतर बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते अग्निशमन दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मुरुड जंजिरा परिसरातील कोस्टल हायवे प्रकल्पातील महत्त्वाचा पूल सध्या वादात अडकला आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने त्यांनी काम बंद पाडल्यामुळे सुमारे 1200 कोटींचा हा प्रकल्प थांबला आहे.
डिजिटल सेवांचा कणा मानलं जाणारं 'आपले सरकार' पोर्टल गेल्या काही दिवसांपासून बंद पडलं आहे. यामुळे राज्यभरात मोठी अडचण निर्माण झाली आहे. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे अपलोड आणि पडताळणीची कामे ठप्प झाली…
एमआयडीसीद्वारे सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट विक्री प्रक्रिया सुरु झाली असली, तरी जाहीर दरांवरून उद्योजकांमध्ये नाराजी आहे. अवास्तव किंमतींमुळे उद्योग उभारणीला अडथळा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागाव समुद्र किनारा हा उरण तालुक्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत…
जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित 17व्या शतकातील दुर्मिळ ‘अस्ट्रोलेब’ लंडनमध्ये लिलावासाठी सादर होणार आहे. खगोलशास्त्रीय गणनेसाठी वापरले जाणारे हे उपकरण त्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जाते.
मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. अंमली पदार्थांबाबतचे कायदे अत्यंत कडक करण्यात आल्याने छोटी चूकही गंभीर ठरू शकते.
चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर प्रस्तावित मालधक्का प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणासोबतच ढिवर समाजाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे ऑनलाइन सेवा बंद पडून शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार आणि इतर कागदपत्रांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना सध्या अडचणीत आली आहे, कारण एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदीसाठी काढलेले ५ कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले आहे.
गडचांदूरमध्ये गॅस एजन्सीच्या गैरप्रकारांमुळे ग्राहकांची लूट होत असून प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली.
Karjat News: कर्जत तालुक्यात उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाई गंभीर बनली असून अनेक गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी…
उरण नगरपरिषद वार्ड क्रमांक ७ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली असून अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आज 'नवभारत इन्स्पायरिंग वुमन समिट अँड अवॉर्ड्स' सोहळा पार पडला. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या सोहळ्यात भारतीय महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले.
महाराष्ट्र सरकारने बाल संगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम आता राज्यभरातील १२१ संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
धानोरा परिसरातून अत्यंत दुर्मिळ शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा नदीकाठी सापडलेल्या जीवाश्म, मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनांमुळे हा परिसर हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या वस्तीचा भाग होता, असे संकेत मिळत…