सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप (Photo Credit - X)
ते म्हणाले, ” बागणी जिल्हा परिषद गटात माझ्या सुनबाई मोहिनी खोत या विजयी झाल्या आहेत; परंतु या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये जयंत पाटील यांची सर्व वक्तव्य एकेरी उल्लेख करून होती, भाषणांमध्ये शिव्या देण्याचा प्रतापही त्यांनी केला, या निवडणुकीमध्ये जातिवाद कसा जास्तीत जास्त भडकेल असा प्रयत्न त्यांनी केला, मतदान गोपनीय असते; मात्र त्यांनी दोन दिवस अगोदर यंत्रणांचा वापर करून मोबाईलद्वारे मतदारांकडून कल जाणून घेतले, सर्व डाटा गोळा करून, ज्या मतदारांनी त्यांना नकार कळवला त्यांना धमकावणे, अमिष दाखवणे असे अनेक प्रकार या ठिकाणी घडले. ” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.”
“माझं कुटुंब बागणी मध्ये ज्या घरामध्ये राहत होतं त्या घरावरती हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी झाला, आम्ही तात्काळ पोहोचलो, त्यामुळं अनर्थ टळला, जयंत पाटलांचा पांढरा चेहरा गुन्हेगारीचा चेहरा आहे, त्यांनी मिरज दंगल घडवली, देवाभाऊ आणि गिरीश महाजन यांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील हे कटकारस्थान मध्ये माहिर आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा खऱ्या अर्थाने शकुनी मामा कोण असेल तर ते जयंत पाटील आहेत, ” अशी उपमा खोत यांनी दिली.






