दुष्काळी अशी ओळख असलेला बीड जिल्हा आता नव्या परिवर्तनाची कहाणी लिहितो. पाण्याअभावी त्रस्त असलेल्या या भूमीतून आता ‘पांढऱ्या सोन्याची’ चमक राज्यभर पसरताना दिसतेय. रेशीम उद्योगामुळे बीडमध्ये आर्थिक क्रांती घडतेय. पूर्वी जालना, बेंगलोरपर्यंत जावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना आता घरच्या जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. दररोज लाखोंची उलाढाल, आणि राज्यभरातून येणारे शेतकरी बीडची ही बाजारपेठ आता विश्वासाचं केंद्र बनतेय. पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर ते विदर्भापर्यंतचे शेतकरी इथे आपला माल विक्रीसाठी आणतायत.
दुष्काळी अशी ओळख असलेला बीड जिल्हा आता नव्या परिवर्तनाची कहाणी लिहितो. पाण्याअभावी त्रस्त असलेल्या या भूमीतून आता ‘पांढऱ्या सोन्याची’ चमक राज्यभर पसरताना दिसतेय. रेशीम उद्योगामुळे बीडमध्ये आर्थिक क्रांती घडतेय. पूर्वी जालना, बेंगलोरपर्यंत जावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना आता घरच्या जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. दररोज लाखोंची उलाढाल, आणि राज्यभरातून येणारे शेतकरी बीडची ही बाजारपेठ आता विश्वासाचं केंद्र बनतेय. पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर ते विदर्भापर्यंतचे शेतकरी इथे आपला माल विक्रीसाठी आणतायत.






