(फोटो सौजन्य: X)
नक्की काय घडलं?
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात वडाचं संपूर्ण झाड जळताना दिसते. मुख्य म्हणजे यानंतरही महिला काही सुधारल्या नाही आणि त्यांनी झाड जळल्यानंतरही त्याच्या जवळ जाऊन तिथे मातीचे दिवे पेटवण्याचा अतिशहाणपणा केला. हे तर असं झालं की, सृष्टी जळो पण दिवा तेवत राहो… ही घटना आस्थेच्या नावाखाली केल्या गेलेल्या मूर्ख वर्तणाचे उत्तम उदाहरण आहे. कुणी याला आता आस्थेचं नाव देत आहे तर कुणी मूर्खपणा असल्याचं म्हणत आहे.
वटसावित्रीची पूजा महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात पार पाडली जाते. यामागे धार्मिक कथा जोडलेली आहे ज्यानुसार, सत्यवानाचे जेव्हा प्राण घ्यायला यम आला तेव्हा पत्नी सावित्रीने चपळतेने पतीचे प्राण त्याच्याकडून परत मिळवले. हे प्राण वडाच्या झाडाखाली परत करण्यात आले होते ज्यामुळे वडाच्या झाडाची विवाहित महिलांकडून पूजा केली जाते. ही पूजा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असली तरी सावधानतेने ती करायला हवी. दिवे झाडाच्या अगदी जवळ चुकूनही लावू नये नाहीतर काय होऊ शकते ते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता.
Everything was fine initially, but some women decided to light clay lamps (diyas) 🪔close to the tree!
Really sad to see such an ancient Vat tree burning because of the stupidity of a few #VatSavitri #वटसावित्री pic.twitter.com/Rzp7Y76f6g — Mihir Jha (@MihirkJha) May 17, 2026
या घटनेचा व्हिडिओ @MihirkJha नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये झाडाला आग लागल्यानंतर महिला रिंगण करत हे दृष्य पाहताना दिसतात तर काही इतकं होऊनही पुन्हा झाडाजवळ दिवे लावण्यासाठी जातानाही दिसून येतात. या व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “झाडाच्या इतक्या जवळ दिवे लावणे हा खरोखरच मूर्खपणा आहे. काही प्रथांचे पालन अत्यंत सावधगिरीने केले पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे यार, ते नुसतेच तिथे उभे आहेत. निदान ते विझवण्याचा तरी प्रयत्न करा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला आग लागल्याचा हा व्हिडिओ पाहणे अत्यंत दुःखद आहे. या दिवशी, विवाहित स्त्रिया दिवे प्रज्वलित करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याकरिता या पवित्र वृक्षाभोवती दोरा गुंडाळतात. पुढच्या वेळी प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि दिवे झाडाच्या सुकलेल्या खोडापासून दूर ठेवले पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






