फोटो सौजन्य AI
US Iran War : अमेरिकेच्या हिमार्स मिसाईलने केला कहर , इराणची शहरं उध्वस्त ?
भारताच्या जमिनीवर चीनने अतिक्रमण केल्याचे वारंवार विरोधी पक्षांकडून सांगितले गेले आहे . अरुणाचल प्रदेश मध्ये तर चीनने पूर्ण गाव वासवल्याचे हि काही लोकांचे म्हणणे आहे . चीनचा साम्रज्यवादी विस्तार हा विचार फक्त भारतासोबतच नसून तिबेट , जपान इत्यादी सारख्या शेजारील राष्ट्रांना चीनचा धोका अधिक असल्याचे देखील बोलले जाते . भारतासोबत चीनच्या बॉर्डरवरती अधून मधून संघर्षाच्या घटना देखील आपण पाहिल्या आहेत . 2020 मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत-चीन संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक स्तरांवर चर्चा झाल्या असल्या, तरी राष्ट्रप्रमुखांच्या प्रत्यक्ष भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे संभाव्य मोदी-शी भेटीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
दरम्यान, BRICS गटाचा जागतिक आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव सातत्याने वाढत असून, सदस्य देशांमधील व्यापार, स्थानिक चलनातील व्यवहार आणि बहुपक्षीय सहकार्य यावरही परिषदेत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात की नाही आणि भारत-चीन संबंधांबाबत कोणते नवे संकेत मिळतात, याकडे जगभरातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.






