War Alert: आता उघड युद्ध होईल! ५५ सैनिकांच्या मृत्यूनंतर ख्वाजा आसिफ यांचा तालिबानला इशारा; भारताचं नाव घेत ओकली विषारी गरळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Khawaja Asif statement on Afghanistan war 2026 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Pakistan Afghanistan War) यांच्यातील सीमावाद आता एका पूर्णवेळ महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. गुरुवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानने कुनार प्रांतात पाकिस्तानवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ प्रचंड व्यथित झाले आहेत. या हल्ल्यात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून, ख्वाजा आसिफ यांनी आता संयंमाची सर्व मर्यादा ओलांडली असल्याचे सांगत अफगाणिस्तानला “खुले युद्ध” करण्याचे आव्हान दिले आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, “पाकिस्तानचे सैन्य काही दुसऱ्या खंडातून आलेले नाही. आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि आम्हाला तुमच्या मर्यादा नीट ठाऊक आहेत.” इतकेच नव्हे तर, आपली हतबलता झाकण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भारताचे नाव घेतले आहे. आसिफ यांचा दावा आहे की, अफगाण तालिबान हे ‘भारत समर्थक’ असून ते भारताच्या इशाऱ्यावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवत आहेत. “तालिबानने अफगाणिस्तानला भारताची वसाहत बनवले आहे,” असा संतापजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL
गुरुवारी रात्री झालेला हा हल्ला इतका भीषण होता की पाकिस्तानी सैन्याला सावरण्याची संधीच मिळाली नाही. अफगाण सैन्याने केवळ हल्लाच केला नाही, तर २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचा आणि १९ लष्करी चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या आक्रमणामुळे खैबर पख्तूनख्वा सीमेवरील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले असून दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर अवजड शस्त्रसाठा सीमेवर तैनात करण्यात आला आहे.
‘Now It Is Open War Between Us And You’ Pakistan Defense Minister Says In Message To Taliban Pak Def Min Khawaja M. Asif said Islamabad’s “cup of patience has overflowed,” accusing the Taliban of turning Afghanistan into “a proxy for India” as cross-border tensions escalate. pic.twitter.com/59aUqHaNTh — RT_India (@RT_India_news) February 27, 2026
credit – social media and Twitter
आपल्या सैनिकांचा मृत्यू आणि चौक्या गमावल्यानंतर पाकिस्तान सरकारने ‘ऑपरेशन गजब लिल हक’ (Operation Gazab Lil Haq) नावाची मोठी लष्करी मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानी लष्करी प्रवक्त्यांच्या दाव्यानुसार, या मोहिमेत आतापर्यंत ७२ अफगाण तालिबानी लढाऊ मारले गेले असून १२० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अफगाण सरकारने हे दावे फेटाळून लावले असून त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय ताब्यात घेतल्याचा पलटवार केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार
ख्वाजा आसिफ यांनी आपल्या विधानात म्हटले की, नाटो सैन्याच्या माघारीनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, सध्याची तालिबान राजवट भारताची ‘प्रॉक्सी’ बनली आहे. त्यांच्या मते, जगभरातील दहशतवादी अफगाणिस्तानात एकत्र येत असून तिथून ते पाकिस्तानमध्ये दहशतवाद निर्यात करत आहेत. पाकिस्तानच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा भारताला ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, ज्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे.
Ans: ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला आहे की तालिबान हे भारत समर्थक आहेत आणि भारताने अफगाणिस्तानला आपली वसाहत बनवून तिथून पाकिस्तानविरुद्ध दहशतवाद पसरवला आहे.
Ans: अफगाण हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेली ही एक लष्करी मोहीम आहे, ज्यामध्ये त्यांनी ७२ अफगाण लढाऊ मारल्याचा दावा केला आहे.
Ans: गुरुवारी रात्री अफगाण सैन्याने कुनार प्रांतात पाकिस्तानवर मोठा हल्ला केला, ज्यात ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि अनेक चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्या.






