Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार 'ऑपरेशन सिंदूर' चे दिशाभूल करणारे धडे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पाकिस्तानने शालेय अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरची खोटी कहाणी समाविष्ट केली आहे.
या कथेत पाकिस्तान स्वतःला विजेता आणि भारताला आक्रमक म्हणून दाखवत आहे.
प्रत्यक्ष वास्तव मात्र अगदी वेगळे असून, पाकिस्तानचे दावे प्रचारापुरते खोटे दावे असल्याचे उघड झाले आहे.
Operation Sindoor : पाकिस्तान सरकारने नुकताच एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. देशातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता “ऑपरेशन सिंदूर” ( Operation Sindoor) नावाने ओळखल्या जाणाऱ्या मे २०२५ मधील भारत-पाक संघर्षाची (india pakistan war) कहाणी समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु ही कहाणी वस्तुस्थितीवर आधारित नसून, पाकिस्तानने आपल्या सोयीप्रमाणे रंगवलेली व खोट्या दाव्यांनी सजवलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार, मुलांना शिकवले जाणार आहे की भारताने कोणतेही कारण नसताना पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानने शौर्याने प्रत्युत्तर देत विजय मिळवला. भारताला आक्रमक तर पाकिस्तानला विजेता म्हणून दाखवले आहे. मात्र प्रत्यक्ष घडलेले वास्तव अगदी उलट होते.
पाठ्यपुस्तकांत लिहिले गेले आहे की ७ मे २०२५ रोजी भारताने काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे खोटे कारण पुढे करून अचानक पाकिस्तानवर हल्ला केला. वास्तव: प्रत्यक्षात, २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. भारतीय कारवाई दहशतवाद्यांविरोधात होती, पाकिस्तानी सैन्य किंवा नागरी क्षेत्राविरोधात नव्हती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह
दुसरा दावा असा आहे की पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची चार राफेल विमाने पाडली आणि अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केले.
वास्तव: पाकिस्तानने याचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. उलटपक्षी, पाकिस्तानने अमृतसर, जम्मू आणि श्रीनगरसह नागरी भागांवर ड्रोन हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोरमधील HQ9 हवाई संरक्षण प्रणाली तसेच सियालकोट आणि इस्लामाबादमधील महत्त्वाचे ठिकाणे नष्ट केली.
पाकिस्तानचा तिसरा मोठा दावा म्हणजे १० मे रोजी त्यांनी २६ भारतीय हवाई तळ उद्ध्वस्त केले.
वास्तव: प्रत्यक्षात भारतानेच पाकिस्तानचे मुरीदके, नूर खान, रफीकी, सरगोधा, चकलाला, रहीम यार खान यांसारखे हवाई तळ उद्ध्वस्त केले.अगदी रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावरही भारतीय कारवाई झाल्याचे पुरावे उपग्रह प्रतिमांतून स्पष्ट दिसत आहेत.
Pakistani version of the recent events in a text book. pic.twitter.com/bs37Rm9asL — Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 29, 2025
credit : social media
पाकिस्तानच्या पुस्तकांत भारताने मोठ्या नुकसानीनंतर युद्धबंदीची विनंती केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्यानुसार पाकिस्तानने ती मान्य केली असे लिहिले आहे. वास्तव: वस्तुस्थिती अगदी उलट आहे. भारताने कधीच मध्यस्थी मान्य केली नाही. अगदी पाकिस्तानचे तत्कालीन उपपंतप्रधान इशाक दार यांनीसुद्धा हे मान्य केले आहे.
पुस्तकांत पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देणे ही युद्धातील ऐतिहासिक उपलब्धी म्हणून दाखवले आहे.
वास्तव: प्रत्यक्षात हा निर्णय राजकीय व प्रचारात्मक होता. युद्धातील विजयाचा संदेश देण्यासाठी आणि जनतेचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते.
शालेय पातळीवर असा विकृत इतिहास शिकवला गेला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. पाकिस्तानातील नव्या पिढीला सत्याऐवजी खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवायला शिकवले जाईल. यामुळे केवळ भारताबद्दल द्वेष निर्माण होणार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी ढासळेल. इतिहास हा वास्तवाचा आरसा असावा, परंतु पाकिस्तानमध्ये तो प्रचाराचे साधन बनला आहे. मुलांना सत्यापासून दुरावून खोट्या विजयकथांचा अभिमान वाटावा, हीच खरी धोक्याची बाब आहे.
भारताने या संपूर्ण संघर्षात संयम आणि स्पष्टता दाखवली. दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मर्यादित कारवाई करून भारताने दाखवून दिले की त्याचे लक्ष्य पाकिस्तानी जनता किंवा सैन्य नव्हे, तर दहशतवाद आहे. जगभरात भारताच्या या भूमिकेचे स्वागत झाले. आज पाकिस्तानने शालेय शिक्षणात खोट्या गोष्टी घुसडल्या आहेत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तथ्ये लपवता येत नाहीत. उपग्रह प्रतिमा, जागतिक मीडिया अहवाल आणि तज्ज्ञांच्या नोंदी यातून वास्तव स्पष्ट होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: ‘ओली असोत किंवा देउबा…’ कोणताही नेता आता नेपाळमधून पळून जाऊ शकणार नाही; कार्की सरकारची जोरदार तयारी
पाकिस्तानी शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झालेले “ऑपरेशन सिंदूर” हे इतिहास नसून एक प्रचार आहे. भारताला आक्रमक दाखवून पाकिस्तान स्वतःला विजेता म्हणत असला तरी सत्य नेहमीच उघड होते. भविष्यातील पिढ्यांना सत्य इतिहास शिकवला गेला नाही तर त्याचे परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागतील.