• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • The Storm Of Pink Cloth Is Coming Nrdm

गुलाबी गमछ्याचील वादळ येतंय !

महराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुकांत ही तेलुगू मोटारगाडी कुणाकुणाला शर्यतीत हरवते की, अर्ध्या रस्त्यावरचं बंद पडते, हे दिसणार आहे. मात्र निवडणुका ताकदीने लढण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून, त्यांचा ताजा पंढरपूर दौरा हाही त्याचं दिशेने टाकलेले दमदार पाऊल होते. आषाढी वारीची वेळ निवडून त्यांनी राजकीय चतुराई देखील दाखवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2023 | 06:00 AM
गुलाबी गमछ्याचील वादळ येतंय !
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
विंदा करंदिकरांची क्षमा मागून एक गाणं सध्या राजकीय वर्तुळात गुणगुणले जाते आहे.
‘गुलाबी धूळ उडते आज,
तिकडून येईल एक ‘मोटारस्वार’,
तुझ्या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड,
माझ्या मनाबन दगड ! ‘
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना सर्व नेत्यांना एक तगडं आव्हान उभे राहते आहे. गुलाबी फेटा डोक्यावर, गुलाबी गमछा गळ्याभोवती आणि मोटरगाडी हे निवडणूक चिन्ह घेऊन कलवाकुंतल चंद्रशेखर राव हे ६९ वर्षांचे ‘तरुण’ गृहस्थ सध्या दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या राजकारणावर आक्रमण करत आहेत. मोदींच्या आणि त्यांच्या राजकीय शिखर कारकीर्दीला जवळपास तितकाच काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्येच देशाच्या राजकीय क्षितिजावर प्रथम चमकले. तोवर आधीचा एक तपाचा कालखंड त्यांनी गुजरातचे नेतृत्व करण्यात घालवला होता. पण भारतीय जनता पक्षाचा एकमेव आशेचा किरण बनून मोदी जे राजधानी दिल्लीत दाखल झाले ते थेट देशाचा एक ठळक राजकीय धृवताराच बनून गेले. आज देशाचे सारे राजकारण त्यांच्याच भोवती फिरते आहे. नेमके तेच स्थान के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी तेलंगणा राज्यात राखले आहे.
तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती या केसीआर यांच्या पक्षाने विधानसभेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तोच निकाल त्यांनी २०१८ च्या दुसऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कायम राखला. ७० टक्के जागा पादाक्रांत करून तेलंगणाचे एकमेव मोठे नेते हा बुहमान त्यांनी मिळवला. आता गेल्या वर्षभरात त्यांनी तेलंगणाप्रमाणेच अन्य राज्यात वर्चस्व स्थापन करता येते का याकडे लक्ष पुरवले आहे. त्यांनी पक्षाचे नाव बदलले असून ते भारत राष्ट्र समिती या नावाने उभे राहात आहेत.
तेलंगणात त्यांना मोटारगाडी हे निवडणूक चिन्ह मिळाले, तेच त्यांना अन्य राज्यांतील निवडणुकांमध्ये ठेवता येते. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुकांत ही तेलगु मोटारगाडी कुणाकुणाला शर्यतीत हरवते की, अर्ध्या रस्त्यातच बंद पडते हे दिसणार आहे. मात्र, निवडणुका ताकदीने लढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून त्यांचा ताजा पंढरपूर दौरा हाही त्याच दिशेने टाकलेले दमदार पाऊल होते. आषाढी वारीची वेळ निवडून त्यांनी राजकीय चतुराईदेखील दाखवलेली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण व शेतकरी समाजाचा फार मोठा उत्सव असतो. महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी वारकऱ्यांच्या दिंड्या आषाढी एकादशीचा मुहूर्त गाठण्यासाठी पंढरपुरात जमतात. तिथले दैवत विठ्ठल- रखुमाई हे विष्णू- लक्ष्मीचे अवतार आहेत, असे भागवत संप्रदाय मानतो. विठ्ठल हा कानडा आहे म्हणजेच दक्षिणेशी त्याचे मूळ जुळले आहे अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. दक्षिणेतून उगवलेल्या पक्षाने महाराष्ट्रात जनाधार शोधण्यासाठी वारीचा मुहूर्त गाठावा हेही लक्षणीय ठरते.
पंढरपूर जवळच केसीआर यांनी एक दणदणित सभाही घेतली. तिथे दर्शनासाठी त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि संपूर्ण विधिमंडळ पक्ष नेला होता. ६०० गाड्यांचा ताफा धुरळा उडवत हैद्राबादेतून आला होता आणि त्यांनी वारीच्या दोन-तीन दिवस आधी दर्शन घेतले व सभाही केली. या सभेत केसीआर यांचा भर राहिला तो अर्थातच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर.
तेलंगणात ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या महाराष्ट्रात द्यायच्या तर राज्याचे दिवाळे वाजेल, अशी टिका काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला अनुलक्षून केसीआर बरसले की, महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात श्रीमंत राज्य आहे. इथल्या सरकारने इतक्या वर्षात शेतकऱ्यांसाठी फार काहीच केले नाही. माझ्याप्रमाणे योजना इथे राबवणे काय अवघड आहे ? जे तेलंगणाला करता आले ते महाराष्ट्रात नक्कीच करता येईल. पण भीती इथल्या नेत्यांना वाटते आहे. ते कंगाल होतील आणि इथला शेतकरी श्रीमंत होईल, अशा योजना आम्हाला राबवायच्या आहेत. केसीआर यांचा नाराचा आहे की ‘अबकी बार शेतकरी सरकार!’ केसीआर यांच्या महाराष्ट्रातील दौरे आणि सभांनी राजकारणात मोठी खळबळ नक्कीच माजवलेली आहे.
त्यांनी अलिकडे दोन-चार मोठ्या सभा घेतल्या. हे जरी खरे असले तरी त्यांनी महाराष्ट्रात घुसण्याची तयारी वर्षभरापूर्वीपासून सुरु केलेली आहे.
माणिक कदम हे परभणीचे शेतकरी नेते सध्या केसीआर यांच्या पक्षाचे महाराष्ट्र शेतकरी सेलचे प्रमुख आहेत. ते आधी राजू शेट्टींच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेचे मोठे नेते होते. त्यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे प्रश्न केसीआर सरकारने कसे सोडवले, याचा अभ्यास केला होता आणि त्यावर ते राज्यात बोलतही होते. त्यांचे एका टीव्ही चॅनेलवरील भाष्य केसीआर यांच्यापर्यंत पोचले. तेव्हा त्यांनी माणिकरावांना हैद्राबाद भेटीचे निमंत्रण दिले. माणिकराव सांगतात की, तेलंगणात रयतु बंधु या योजनेखाली शेतकऱ्यांना दरसाल ठराविक मदत दिली जाते. त्यांच्या शेतीला पाणी आणि कृषीपंपांसाठी वीज चोवीस तास उपलब्ध केली जाते. त्यामुळे तेलंगणात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही आणि महाराष्ट्रात दरसाल शेकडो शेतकऱ्यांना कीटककाशके पिऊन वा फाशी घेऊन जीवनयात्रा संपवावी लागते हे केव्हढे दुर्दैवी आहे. पण आपल्या राज्यकर्त्यांना मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात त्यांना शेतीचे प्रश्न सोडवताच आलेले नाहीत. तेलंगणात केसीआर सरकाने रखडलेला धरणप्रकल्प अवघ्या काही वर्षातच पुरा करून दाखवला आणि लगतच्या मराठवाड्यातील शेतकरी भारावून गेला, असे कदम म्हणतात.
राजु शेट्टी म्हणतात की, ‘सबका साथ सबका विश्वास’ या घोषणेवर आपण मागच्या वेळी भुललो होतो. पण मोदींच्या राजवटीतही शेतकरी सुखावलेला नाही. आता केसीआर खरोखरीच शेती आणि शेतकऱ्यासाठी काही चंगले काम करणार असतील तर विचार करावा लागेल. राजकीय क्षितिजावरचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील महत्वाचे नेते केसीआर यांच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत व ही बाब सर्वच राजकीय नेत्यांना चिंतेची वाटू लागली आहे.
परवाच भगिरथ भालके पंढरपूरच्या सभेत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत दाखल झाले. हे सर्वात ताजे शिलेदार. या आधी माजी खासदार हरिभाऊ राठोड हे काँग्रेसचे, तर भारतीय जनता पक्षांचे मागील काळातली आमदार राहिलेले नागपूरचे चरण वाघमारे आणि यवतमाळचे राजू तोडसाम हे सध्या केसीआर यांच्या पंखाखाली गेले आहेत. असंख्य कार्यकर्ते तिकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे गावोगावी बीआरएसचे बॅनर पोस्टर झळकू लागले आहेत. भारत भालके हे पंढरपूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार यांचे करोनात निधन झाले तेव्हा राष्ट्रवादीने त्यांचे पुत्र भालके यांना पोटनिवडणुकीत उतरवले होते. पण ते पराभूत झाले. आता ते बीआरएसकडे गेले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते सावध झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान बीआरएस महाराष्ट्रात करु शकेल असे दिसते. काँग्रेसने बीआरएसला आपल्या प्रमुख शत्रुंच्या यादीत टाकले आहे.
२०२३च्या अखेरीकडे देशात ज्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत त्यात तेलंगणाचाही समावेश आहे. तिथे ११९ सदस्यांच्या विधानसभेत टीआरएसचे १०३ आमदार सध्या आहेत. काँग्रेसला २०१८ च्या निवडणुकीत पंधरा जागा लाभल्या होत्या. पण त्यातील दहा केसीआरकडे पळाले होते व सध्या काँग्रेसचे पाच भाजपचे दोन आणि एमआयएमचा एखादा इतकेच विरोधी आमदार तिथल्या विधानसभेत दिसतात. हे चित्र २०२३ च्या निवडणुकीत पालटेल असा विश्वास काँग्रेसला वाटतो. कर्नाटकात जसा भाजपचा पराभव केला तसाच पराभव तेलंगणात केसीआरचा करू, अशा वल्गना काँग्रेसचे स्थानिक नेते करत आहेत. महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी केसीआर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. याच कारणामुळे केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाकडून ‘अबकी बार शेतकरी सरकार’ असा प्रचार केला जात आहे. विदर्भ आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी केसीआर विशेष प्रयत्न करत आहेत. ते महाराष्ट्रात ‘तेलंगणा मॉडेल’ राबवू पाहात आहेत.
महाराष्ट्रातील ४५ हजार गावांमध्ये पक्षाचे जाळे निर्माण करण्यासाठी केसीआर यांनी साधारण महिन्याभराचा कार्यक्रम जाहीर केला आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावर भाजप, शिवसेना (शिंदे गट), तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाने केसीआर यांचे स्वागत केले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केसीआर यांच्या पक्षविस्ताराच्या मोहिमेवर टीका केली आहे. काँग्रेसने अलिकडेच दिल्लीत पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम केला आणि केसीआर यांच्या ३५ माजी खासदार- आमदारांना काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले. भाजपातही केसीआरवर चिडून बाहेर पडेलेले माजी मंत्री कार्यरत आहेत. त्या सर्वांच्या प्रभावाने केसीआर यांच्याकडे नक्कीच घटतील. पण सत्ता मात्र बीआरएसच्याच हाती राहील. तसे झाले तर २०२४ ला ते अधिक जोर लावणार यात शंका नाही.
– aniketsjoshi@hotmail.com
– अनिकेत जोशी

Web Title: The storm of pink cloth is coming nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • BJP
  • BRS)
  • Telangana

संबंधित बातम्या

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
1

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’
2

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…
3

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप
4

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

Feb 05, 2026 | 09:55 PM
ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

Feb 05, 2026 | 09:43 PM
“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Feb 05, 2026 | 09:39 PM
DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 

DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 

Feb 05, 2026 | 09:19 PM
UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

Feb 05, 2026 | 09:18 PM
DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक 

DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक 

Feb 05, 2026 | 08:52 PM
T20 World Cup मध्ये सर्वात वेगवान शतकाचा मान कोणाकडे? फक्त ‘इतक्या’ चेंडूत रचला इतिहास

T20 World Cup मध्ये सर्वात वेगवान शतकाचा मान कोणाकडे? फक्त ‘इतक्या’ चेंडूत रचला इतिहास

Feb 05, 2026 | 08:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.