"पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत"; राहुल गांधींचा घणाघाती आरोप (Photo Credit- X)
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत. त्यांनी म्हटले, “मी दुपारीच सांगितले होते की पंतप्रधान संसदेत येणार नाहीत. ते घाबरलेले आहेत आणि त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही.”
जैसा मैंने कहा, पीएम मोदी संसद में नहीं आएंगे क्योंकि वो डरे हुए हैं और सच्चाई का सामना नहीं करना चाहते। pic.twitter.com/1d2UmvR9mz — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2026
लोकसभेत सायंकाळी ५ वाजता कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षस्थानी असलेल्या सभापती संध्या राय यांनी खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने सुरूच राहिली. या अभूतपूर्व गोंधळामुळे पंतप्रधान आपले निवेदन देऊ शकले नाहीत आणि त्यांचे भाषण पुढे ढकलण्यात आले.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत सरकारला घेरले. “पंतप्रधान आले असते तर मी त्यांना जनरल नरवणे यांचे पुस्तक भेट दिले असते. हे पुस्तक कोणत्याही परदेशी लेखकाने नाही, तर भारताच्या माजी लष्करप्रमुखांनी लिहिले आहे.” काय आहे आरोप? राहुल गांधींच्या मते, या पुस्तकात असा उल्लेख आहे की चिनी सैन्याने घुसखोरी केली तेव्हा लष्कराला निर्णयासाठी वाट पाहण्यास भाग पाडले गेले आणि पंतप्रधानांनी जबाबदारी लष्करावर ढकलली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, हे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशित झालेले नाही.
राहुल गांधींनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर राजकीय नेतृत्व मागे हटले आहे. “मला हे मुद्दे संसदेत उपस्थित करायचे होते, पण आम्हाला बोलण्यापासून रोखले गेले आणि सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे,” असेही ते म्हणाले.






