UPSC च्या नियमांत मोठा बदल! (Photo Credit- X)
UPSC ने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, जे उमेदवार आधीच IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) किंवा IFS (भारतीय वन सेवा) मध्ये नियुक्त झाले आहेत आणि त्या पदावर कार्यरत आहेत, त्यांना पुन्हा नागरी सेवा परीक्षा देता येणार नाही. तसेच, जर एखाद्या उमेदवाराची मुख्य परीक्षेच्या (Mains) निकालापूर्वी या दोन सेवांपैकी एका सेवेत नियुक्ती झाली, तर त्याला मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारली जाईल.
जर एखादा उमेदवार आधीच IPS (भारतीय पोलीस सेवा) मध्ये कार्यरत असेल, तर तो CSE २०२६ मध्ये पुन्हा एकदा ‘IPS’ या पदासाठी पसंतीक्रम देऊ शकणार नाही. थोडक्यात, एकाच पदावर असताना त्याच पदासाठी पुन्हा अर्ज करण्याच्या प्रवृत्तीला आयोगाने चाप लावला आहे.
This is real reason of delay, it seems #UPSC2026 IPS will be given JUST one chance to move to IAS/IFS pic.twitter.com/QtnTaaTO9p — UPSC CSE WHY (@CseWhy) February 4, 2026
ज्या उमेदवारांनी CSE २०२५ किंवा त्यापूर्वी कोणत्याही सेवेत प्रवेश केला आहे, त्यांना त्यांचे उर्वरित अटेम्प्ट्स (संधी) वापरण्यासाठी २०२६ किंवा २०२७ मध्ये एक अंतिम संधी देण्यात आली आहे. यासाठी त्यांना सध्याच्या पदाचा राजीनामा देण्याची गरज भासणार नाही. मात्र, ‘ग्रुप A’ सेवेतील उमेदवारांना संबंधित विभागाकडून ‘ट्रेनिंगमध्ये सहभागी न होण्याची सवलत’ मिळाल्यावरच परीक्षेला बसता येईल.
परीक्षेतील गैरप्रकार आणि डमी उमेदवारांना रोखण्यासाठी आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. आता प्रत्येक उमेदवाराचे AI-आधारित फेशियल रिकॉग्निशन (चेहरा ओळखणे) आणि आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
शिक्षण अधिकारी कसे व्हायचे? एकदा वाचाल तर आयुष्य घडवाल, पूर्ण प्रक्रिया






