नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल (Photo Credit- X)
आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही? नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय?… pic.twitter.com/N5uSQgdvXS — Amit Thackeray (@amitrthackeray) May 3, 2026
आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही? नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
गेल्या काही महिन्यांतील घटनांची मालिका पाहिली तर अंगावर काटा येतो. नसरापूर, बदलापूर, ठाणे, पुणे, चाकण, महाळुंगे… अशा किती जागांची आणि किती निष्पापांची नावं आपण घ्यायची? प्रत्येक वेळी नवी घटना घडते, आपण दोन दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. म्हणूनच पोर्शे अपघातात निबंध लिहून सुटका होते आणि नेस्कोमध्ये ओव्हरडोसमुळे जीव जाऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नाही. ही व्यवस्थेची लाचारी नाही तर काय आहे?
माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहितीये की कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे.
Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली
‘शक्ती कायद्याच्या’ गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये? केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो.
आज परिस्थिती इतकी भीषण आहे की, उद्या आपली मुलं घराबाहेर सुरक्षित असतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सत्तेत बसलेले लोक १० दिवसांनी जुन्या घटना विसरून नवीन जाहिरातींमध्ये दंग होतात, पण पीडितांचे काय? माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे, पोलिसांना फक्त २४ तासांचा ‘फ्री हॅण्ड’ द्या! आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत.
लोकशाहीत आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करतोय, पण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचे आहे. मी इथे एक ‘नेता’ म्हणून नाही, तर एक सामान्य ‘माणूस’ आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय… आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत?
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “चार वर्षांच्या बालिकेवर असा अमानवी प्रकार घडतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून नागरिक असुरक्षित आहेत,” अशा शब्दात त्यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेला गृहविभागाचे अपयश मानले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे गुन्हेगार मोकाट आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी प्रायश्चित म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
दुसरीकडे, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले आहे. “आम्ही या प्रकरणी कठोर पावले उचलली असून कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही,” असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल






