भिवंडी: भिवंडी पोलिसांना दहा महिन्यापासून फरार असेलल्या आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. परंतु त्याच्या हातावरील टॅटू त्याच्या अटकेचा कारण बनला. टॅटूने हत्येचे रहस्य उलगडले. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राजू महेंद्र सिंह आहे, जो उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी आहे. २०२४ मध्ये त्याने प्रेमप्रकरणातून एका महिलेची निर्घृण हत्या केली होती आणि तेव्हापासून तो फरार होता. पोलिस त्याचा सतत शोध घेत होते, परंतु आरोपी मोबाईल फोन बंद करून आणि वारंवार त्याचे ठिकाण बदलून पळून जात होता. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात लपून बसला, तर कधी मध्य प्रदेशात पळाला.
अखेर शांती नगर पोलिसांना ठोस माहिती मिळाली. आरोपी राजू हा इंदूरच्या देवास नाका परिसरात लपला आहे. पोलीस पथकाने इंदूर गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचला. त्याला पकडले तेव्हा त्याने आपले नाव ‘सूरज’ असे सांगून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या हातावरील टॅटूने त्याची खरी ओळख उघड केली. अटकेच्या वेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या दक्षतेसमोर त्याचे सर्व युक्त्या अपयशी ठरल्या. आरोपीला भिवंडी येथे आणण्यात आले आणि न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
दरम्यान शांती नगर भिवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी याबाबतची माहिती देतांना म्हंटले की, आरोपी गेल्या १० महिन्यांपासून फरार होता. तो त्याचे ठिकाण बदलत होता आणि पोलिसांना चुकवत होता. तो इंदूरमध्ये लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली.