काय नेमकं प्रकरण?
बुधवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास येडेनिपाणी गावातील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. शेतजमिनीच्या हद्दीचा आणि शेतातील हत्तीगवत काढण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून प्रमोद जाधव यांनी शिवाजी पाटील यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समजल्यानंतर किशोर पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वाद अधिकच चिघळला आणि आरोपीने घरातून तलवार आणत “तुम्हाला आता जिवंत ठेवत नाही” अशी धमकी देत हल्ला केला. शिवाजी पाटील यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार अडवताना बाजीराव हणमंत पाटील यांच्या उजव्या हाताच्या पंजावर गंभीर जखम झाली.
त्यानंतर प्रमोद जाधव यांनी शिवाजी पाटील यांच्या हातावर व पाठीवर, अरुण पाटील यांच्या मनगटावर व कपाळावर, प्रवीण पाटील यांच्या नाकावर तसेच विजयकुमार पाटील यांच्या डाव्या हातावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
गुन्हा दाखल
विनायक जाधव यांनी हातातील दगडाने मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.याप्रकरणी किशोर बाजीराव पाटील (रा. येडेनिपाणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद शिवाजी जाधव (आलुगडे) व विनायक शिवाजी जाधव (आलुगडे, दोघे रा. येडेनिपाणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा
Ans: येडेनिपाणी, ता. वाळवा (सांगली).
Ans: शेतजमिनीची हद्द आणि हत्तीगवत काढण्याचा वाद.
Ans: एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले.






