काय घडलं नेमकं?
वकील मिथुन भास्कर यानाच्या मांडीवर धारदार चाकूने गंभीर वार करण्यात आले होते. हल्ल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य रस्त्यापासून १५० फूट आत झुडपांमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. गुन्हेगारांनी तिथेच त्यांच्यावर हल्ला केला असावा. जीव वाचवण्यासाठी ते रस्त्यापर्यंत आले. मात्र मदतीपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. तपासात त्यांची गाडी घटनास्थळी उभी होती. गाडीवर पोलिसांना दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे हाताचे ठसे आढळले आहेत, जे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. गाडीच्या डिकीमध्ये काही न्यायालयीन कागदपत्रे सुरक्षित आढळली असून, आरोपींनी गाडीला स्पर्श केला नव्हता.
पोलीस तपास सुरु
पोलीस या घटनेचा तपास सर्व पैलूंनी करत आहे. रात्रीच्या वेळी वकील भास्कर तिथे कोणाला भेटायला गेले होते? हत्या करण्या मागचे कारण काय? अश्या सगळ्या प्रश्नांचे तपास पोलीस करत आहे. पोलीस आरोपींच्या शोधात रवाना झाली आहेत. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.
मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यावरून वडिलांसोबत भांडण झाल्याने संतापलेल्या १८ वर्षीय थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आईच्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील करमाड ठाणे १० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Ans: मिथुन भास्कर (49), उच्च न्यायालयाचे वकील होते.
Ans: छत्रपती संभाजीनगरच्या गांधेली फाट्याजवळ ही घटना घडली.
Ans: प्राथमिक अंदाजानुसार लूटमार किंवा जुने वैमनस्य असू शकते; तपास सुरू आहे.






