काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कालव्यात गेली. दरम्यान, चालकाने कारबाहेर उडी मारली. कालव्याला पाणी असल्यामुळे कारमधील पती-पत्नी असे दोघे कारसह पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
रात्री उशिरा जेसीबीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध अद्याप सुरू होता. तर वाचवण्यासाठी गेलेला गावातील एक तरुणही बेपत्ता आहे. त्यामुळे आता एकूण तिन जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथून एक दुर्दवी घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणाची पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. १६०० मीटर फिजिकल टेस्ट सुरु होती. या दरम्यान धावतांना तरुण जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात घडली.
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असे आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता. शनिवारी सकाळी साधारण ८.१५ वाजता १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावायला सुरुवात केली. त्याने काही अंतर पार केला, मात्र त्याला रनिंग लाइनवर धावत असतांना चक्कर आली आणि तो रनिंग लाइनवर पडला. विशेष म्हणजे पहिल्या दोन फेरीत तो पहिला आला होता.
संग्राम अत्यंत मेहनती आणि जिद्दी होता. पोलिसात भरती झाल्यावर आपल्या कुटुंबातील दारिद्र्य त्याला दूर करायचं होतं. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उडून तो सराव करीत होता. मात्र नियतीला काही वेगळं मान्य होत. त्याचा स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी
Ans: पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार कालव्यात गेली.
Ans: पती-पत्नी आणि बचावासाठी गेलेला एक तरुण — एकूण तीन जण.
Ans: त्याने कारमधून उडी मारून जीव वाचवला.






