काय घडलं नेमकं?
राजीव गांधी भवन परिसरात एक संतापजनक घटना घडली. पत्नी इंस्टाग्राम चॅट करत होती. हे पतीला पसंत पडले नाही. त्यातून पतीला राग आला आणि तो राग अनावर झाला. त्याने पत्नीला थेट मारण्याच्या उद्देशाने गाडीत बसवले. पण पत्नीने जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर ही त्याने तिच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार राजीव गांधी भवन परिसरात घडला. उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा सगळं भयंकर प्रकार पहिला. नागरिकांनी तिची मदत केली त्यामुळे तिचा जीव वाचला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने आपल्या सोबत असं का केलं असा प्रश्न तिला पडला आहे. पती हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पती समीर पठाण याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नाशिकमध्ये चर्चा रंगली आहे.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत
नाशिक येथून एक अपघाताची भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव चार चाकी गाडी विहिरीत कोसळली. यात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले ९ जण हे एकाच कुटुंबातील आहे आणि यात तीन ते चार जणांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. घटनास्थळी शोधमोहिमेदरम्यान मोठा जमाव झाला होता.
अपघात कश्यामुळे झाला अद्याप अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (३ एप्रिल २०२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक ईरटीका कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. यावेळी गाडीत एकूण ९ जण होते. ईरटीका गाडीसह गाडीतील नऊ जण विहिरीत कोसळले आणि ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर NDRF, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते. मात्र विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. अद्याप कश्यामुळे अपघात झाला हे स्पष्ट झालेले नाही आहे.
Dharashiv News : येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना अटक; 1.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
Ans: पत्नीच्या इंस्टाग्राम चॅटवरून पतीला संशय आल्याने हल्ला झाला.
Ans: नागरिकांनी हस्तक्षेप करून तिचा जीव वाचवला.
Ans: आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला.






