काय नेमकं प्रकरण?
२०२० साली ईशान्य दिल्लीत दंगली झाल्या होत्या. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यासह जावेद, अनस, नाझिम आणि कासिम यांच्यावर आरोप करण्यात आला होता. ताहीर हुसेन याचा नाव समोर येताच ‘आप’ने त्याला निलंबित केले आणि तेव्हापासून पक्षाचा त्यांच्याशी कोणताही संबंध राहिलेला नाही असे आप (AAP) ने म्हटले आहे.
न्यायालयाने ठरवलं दोषी
ताहिर हुसेनला करकरडूमा न्यायालयाने शत्रुत्व वाढवणे, दंगल, हल्ला, गुन्हेगारी बळाचा वापर आणि खून या आरोपांखाली दोषी ठरवले. फिर्यादी पक्ष आरोपींचा गुन्हा निःसंदिग्धपणे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्याचे नमूद करून, न्यायालयाने इतर सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले. शिक्षेचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही, आणि न्यायालयाने शिक्षेवरील युक्तिवाद ऐकण्यासाठी नंतरची तारीख निश्चित केली आहे. हुसेनचे वकील, अब्दुल गफ्फार म्हणाले की, ते “न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करतील”. तर अंकीत शर्मा यांचे भाऊ अंकुर यांनी दोषीला जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली.
दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलछा काय म्हणाले?
दंगलीच्या तपासाचे नेतृत्व करणारे दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलछा म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि निष्पक्ष, निःपक्षपाती व पुराव्यांवर आधारित तपास सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. “विश्वासार्ह पुरावे गोळा करण्यासाठी आणि जबाबदार लोकांना कायद्यासमोर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. न्यायालयाने आपला निकाल दिल्याने, तपास पथकाची मेहनत आणि व्यावसायिकता न्यायालयीन छाननीत यशस्वी ठरली आहे, याचे मला समाधान वाटते,” असे ते म्हणाले.
फिर्यादी पक्षाने काय म्हंटले?
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, हुसेन आणि सहआरोपी हे त्या बेकायदेशीर जमावाचा भाग होते, ज्याने दंगलीदरम्यान गुप्तचर अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यावर, न्यायालयाने फिर्यादी पक्षाचा हा युक्तिवाद देखील नोंदवून घेतला होता की, हुसेनने जमावाला हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी भडकवले होते आणि “त्यांना सोडू नका” असे आवाहन केले होते. यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने आरोप आणि रेकॉर्डवर ठेवलेले पुरावे विचारात घेऊन हुसेनची या प्रकरणात जामिनाची याचिका फेटाळून लावली होती. नंतर त्या अधिकाऱ्याचा मृतदेह एका गटारातून बाहेर काढण्यात आला. त्याची ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा आणि शरीराचे इतर भाग ॲसिडने जाळण्यात आले होते.
पीडितेचे वडील रवींद्र कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा २६ फेब्रुवारी २०२० रोजी नोंदवण्यात आला. त्याने आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, चांद बाग पुलिया, मेन करावल नगर रोड येथे गेल्या २-३ दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणारे आणि समर्थन करणारे आंदोलक निदर्शने करत असून, यामध्ये दोन्ही बाजूंनी दगडफेक, वीटफेक, जाळपोळ, गोळीबार आणि घातपाताच्या घटना घडल्या आहेत.
त्यांनी असाही आरोप केला की, तत्कालीन नगरसेवक मोहम्मद ताहीर यांचे कार्यालय चांद बाग पुलियाजवळ, मेन करावल नगर रोडवर होते आणि त्यांनी आपल्या कार्यालयात मोठ्या संख्येने गुंड जमवले होते. जमावाने ताहीर हुसेन यांच्या इमारतीच्या/कार्यालयाच्या छतावरून दगडफेक केली, पेट्रोल बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, तसेच त्यांनी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
२५ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांचा मुलगा अंकित शर्मा कार्यालयातून परत आला होता आणि सायंकाळी सुमारे ५ वाजता काही घरगुती सामान आणण्यासाठी पुन्हा बाहेर गेला होता. बराच वेळ होऊनही जेव्हा त्याचा मुलगा परत आला नाही, तेव्हा त्याने जवळपासच्या ठिकाणी, रुग्णालयांमध्ये इत्यादी ठिकाणी त्याचा शोध सुरू केला. रात्रभर वाट पाहिल्यानंतर, त्याने २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११.४१ वाजता आपला मुलगा अंकित शर्मा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. नंतर तक्रारदाराला स्थानिक मुलांकडून समजले की, त्याची हत्या केल्यानंतर चांद बाग पुलियाच्या मशिदीतून एक मृतदेह खजुरी खास नाल्यात फेकून देण्यात आला होता.
Ans: ताहीर हुसेनसह पाच आरोपी.
Ans: सहा आरोपी.
Ans: शिक्षेवरील सुनावणी होऊन शिक्षा निश्चित केली जाणार आहे.






