काय घडलं नेमकं?
नीरज हाजरा अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीरजाच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. उर्मिला कुमारी असे आरोपी तरुणीचे नाव आहे. उर्मिलाने तिचा प्रियकर म्हणजेच स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा नवरा सुभाष पासवान ऊर्फ राजदेव हाजरा (वय ३०, रा. जमुई, बिहार) याची मदत घेतली. उर्मिला आणि सुभाष या दोघांचे दोन वर्षांपासून घनिष्ठ प्रेमसंबंध होते. मात्र या दरम्यान उर्मिलाचे ठरले. नीरजशी लग्न ठरल्यापासून सुभाष उर्मिलावर हे लग्न मोडण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र, लग्न मोडणे शक्य न झाल्याने नीराजचा काटा काढण्याचा ठरवलं.
Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून
कशी केली हत्या?
नीरज हा राजस्थान येथे कामाला होता आणि स्वतःच्या लग्नासाठीच तो गावी परतला होता. त्याचे लग्न ७ जुलै रोजी होणार होते. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी ४ जुलै सुभाषने नीरजला लग्नापूर्वी पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर ते दोघे बिहारमधील जमुई येथे गेले. त्यानंतर उर्मिलाने नीराजला फोन करून झारखंड-बिहार सीमेवरील बेला जंगलाजवळ भेटायला बोलावले. नीरज तिथे पोहोचला तेव्हा त्याला नाश देण्यात आली. त्यांनतर आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सुभाषने उर्मिलाच्या मदतीने नीरजवर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नीरजचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर दोघांनी नीरजचा मृतदेह जंगलातील एका निर्जन भागात फेकून दिला. त्यांना वाटले की जंगलातील वन्य प्राणी मृतदेह खाऊन टाकली आणि हत्येचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही. मात्र ५ जुलै रोजी नीरज अचानक बेपत्ता झाल्याने अखेर शेजारच्या बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील बिचकोरवा येथील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.
आरोपी अटकेत
पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली. कसून चौकशी केली असता सुभाष हाजराने उर्मिलासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले २ चाकू, एक स्कूटी आणि एक मोटारसायकल जप्त केलीय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी
Ans: मेहुण्यासोबतचे प्रेमसंबंध.
Ans: जंगलात बोलावून चाकूने वार करून.
Ans: दोन्ही आरोपींना अटक करून तपास सुरू केला.






