काय नेमकं प्रकरण?
संजय प्रभाकर परांजपे हे पलूस मधील कुंडलवेस भागातील एका अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. संजय परांजपे हे घटनेच्या वेळी आपल्या कुटुंबासह घरीच बसले होते. काही वेळानंतर त्याच्याने कुठले आणि इमारतीच्या खाली असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र बराच वेळ परतन आल्याने कुटुंबातील सदस्यांना त्यांची काळजी वाटू लागली. त्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी इमारतीच्या खाली धाव घेतली तेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकाबंदी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुरावे गोळ्या करण्याचा काम सुरू होता. हल्ले पोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना परांजपे यांना गाठून त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
शैक्षणिक क्षेत्रात शोककळा
संजय परांजपे हे शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या हत्तीच्या बातमीने शैक्षणिक क्षेत्रातही शोकळा पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून परांजपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Ans: संजय प्रभाकर परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे संचालक होते.
Ans: ही घटना सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात घडली.
Ans: हल्लेखोरांनी पाळत ठेवून मंदिरात जाताना किंवा परतताना त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे.






