नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव सलमान खान असे आहे. तो उत्तर प्रदेशमधून त्याच्या कारने महाराष्ट्रात आला होता. तो आपल्या पत्नीसह तीन चिमुकल्या मुलांसह प्रवास सुरु केला. मात्र प्रवासात पती- पत्नीमध्ये चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद झाला. याच वादाचं रूपांतर हत्येत झाला. सलमान याने संतापून आपल्या पत्नीची गळा हत्या केली. तेव्हा या दोघांची तीन लहान मुलंही गाडीतच होती. हा सगळा प्रकार त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. हत्या झालेल्या पत्नीचे नाव हसीना बांनो असे आहे.
धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…
त्यांनतर त्याने काही किलोमीटरचा प्रवास करत कारंजाचा पोलीस ठाणे गाठले. आणि गुन्हयाची कबुली दिली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या लहान मुलांचे काय करायचे, हा प्रश्न पोलिसांना पडला. आईची हत्या झाल्याने आणि वडील आता तुरुंगात जाणार असल्याने ही तिन्ही लहान मुलं पोरकी झाली आहेत. सलमान आपल्यासोबतच या तीन चिमुरड्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आला आणि त्यांना तिथेच अंथरलेल्या एका ब्लँकेटवर झोपले. या तिन्ही निरागस आणि निष्पाप मुलांना त्यांच्या आईसोबत नेमकं काय झालं आहे आणि आता आपल्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे, याची थोडीशी कल्पना नव्हती. ही तिन्ही चिमुकली मुलं आपल्या वडिलांसोबत अगदी निरागसपणे चालत पोलीस स्टेशनमध्ये शिरली आणि तिथे अंथरलेल्या एका ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली. हा प्रसंग पोलीस स्टेशनमधील उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारा होता.
Ans: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर.
Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय.
Ans: तीन मुलांना घेऊन कारंजा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.