काय घडलं नेमकं?
नीरज हाजरा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भिखोडीह गावचा रहिवासी आहे. ५ जुलै रोजी नीरज अचानक बेपत्ता झाला. त्याचे वडील, सुभाष हाजरा यांनी जमुआ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. सुरुवातीला, पोलिसांनी हे एक सामान्य बेपत्ता होण्याचे प्रकरण समजून तपास सुरू केला. मात्र, नीरजचे अपहरण झाल्याचा कुटुंबाला संशय आला. त्यानंतर, ८ जुलै रोजी विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष तपास पथक स्थापन करत सुरू करण्यात आला.
Pune Crime: भिंतीला भगदाड… गॅसकटरने लॉकर फोडला; पुण्यातील सराफी पेढीत लाखोंची धाडसी चोरी
या तपास पथकाने मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाला सुरुवात केली. पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडले. यामुळे हे पथक बिहारमधील जमुई जिल्ह्यातील बिचकोडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेला जंगलात पोहोचले. तिथे सापडलेला एक अज्ञात मृतदेह नीरज हाजरा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सखोल तपासणी करत नीरजची होणारी पत्नी उर्मिला कुमारी हीला ताब्यात घेतले.
धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी उर्मिला कुमारीची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचे दाजी सुभाष पासवान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे बऱ्याच काळापासून संपर्कात होते. उर्मिलाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न नीरज हाजरासोबत ठरवले. त्यांच्या लग्नाला फक्त तीन दिवस उरले होते. उर्मिला आणि तिचा प्रियकर या नात्यामुळे आनंदी नव्हते. या दोघांनी नीरजची हत्या करण्याचे ठरवले. नीरजची हत्या केल्यांनतर ओळख लपवण्यासाठी आणि गुन्ह्याचे पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह एका जंगलात फेकून देण्यात आला.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी त्या तरुणीला आणि तिचा प्रियकर दाजीला दोघांनाही अटक केली. इतर संशयितांच्या शोधासाठी झारखंड आणि बिहारमध्ये छापे टाकले जात आहेत. आरोपींनी हत्या कशी केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…
Ans: झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात.
Ans: तरुणीचे तिच्या दाजीसोबत प्रेमसंबंध होते आणि होणारा पती त्यात अडथळा ठरत होता.
Ans: एसआयटीने मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला.






