दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…
काय घडलं नेमकं?
सोमवारी नसीरला एक कॉल आला, त्यानंतर नसीर घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी परतलेच नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा छडा लावला. नसीर बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची मोटारसायकल एका कालव्यात सापडली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. संतप्त जमावाने रास्ता रोको करत जोरदार निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन दिवसात रिजवान हसन मंडल आणि सागर गेन या दोन संशयितांना अटक केली. यातील मंडल हा बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
मृतदेहाचे छिन्नविछिन्न तुकडे
रिजवान हसन मंडल आणि सागर गेन या दोन संशयितांची चौकशी केली असता आरोपींनी कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बागुरीया परिसरातील विविध कालव्यांमध्ये शोध मोहीम राबवली. अनेक तासांच्या शोध कार्यानंतर नसीर अली यांच्या मृतदेहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे पोलिसांच्या हाती लागले.
का करण्यात आली हत्या?
नसीरची हत्या का करण्यात आली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नसीर अली यांच्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…
Ans: पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात.
Ans: दोन संशयितांना अटक करून मृतदेहाचे तुकडे जप्त केले.
Ans: प्राथमिक तपासानुसार अनैतिक संबंधातून गुन्हा घडल्याचा संशय आहे.






