( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. आज अखेर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हे दोघं लग्नबंधनात अडकले आहेत.छत्रपती संभाजीनगर येथे निखिल आणि अनुष्काचा विवाह संपन्न झाला असून त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयुष्यातील या अनमोल क्षणासाठी अनुष्काने नऊवारी नेसून पारंपारिक मराठमोळा लूक केला होता. तर निखिलनेही धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. यांच्या लग्नसोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे त्यांच्या एन्ट्रीने. लग्नमंडपात एन्ट्री करताना अनुष्काने डोक्यावर तुळस आणि निखिलने हातात भगवा झेंडा घेत एन्ट्री केल्याचे दिसत आहे. या पद्धतीच्या एन्ट्रीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे.
निखिलने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
दुसरीकडे, अनुष्काने ‘तुझीच रे’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘श्री लक्ष्मी नारायण’ यांसारख्या मालिकांमधून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या ती ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.ऑनस्क्रीन सुरू झालेली ही प्रेमकथा आता खऱ्या आयुष्यात नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे. त्यामुळे या लोकप्रिय जोडीच्या लग्नाची चर्चा सध्या मराठी मनोरंजन विश्वात रंगली आहे.






