फोटो सौजन्य - Social Media
शोदरम्यान अभिनेता राम कपूर यांनी आकांक्षाला दुसऱ्या लग्नासाठी गौरव खन्नाचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला. मात्र, आकांक्षाने तो स्पष्ट शब्दांत फेटाळत लावत, “मी लग्नाबाबत गौरवचा सल्ला कधीच घेणार नाही,” असे सांगितले.
त्यानंतर सहस्पर्धक पामेलासोबत संवाद साधताना आकांक्षाने सांगितले की, तिचे लग्न अवघ्या २४ व्या वर्षी झाले होते. मात्र, आता ती पुन्हा लग्न करणार नसून पहिल्यांदाच स्वतःच्या घरात स्वतंत्रपणे राहणार असल्याचे तिने सांगितले. “आता मी आई-वडिलांच्या किंवा पतीच्या घरात नाही, तर स्वतःच्या घरात एकटी राहणार आहे,” असे ती म्हणाली.
घटस्फोटामागील कारणाबाबत बोलताना आकांक्षाने सांगितले की, वैवाहिक आयुष्यात तिच्यात मातृत्वाची भावना (Maternal Instinct) कधीच निर्माण झाली नाही. सुरुवातीला ती त्यासाठी खुली होती, मात्र कालांतराने आपण आई होण्यासाठी तयार नसल्याचे तिला जाणवले. तिच्या मते, याच मुद्द्यावर कालांतराने दोघांच्या विचारांमध्ये बदल झाला.
Hemant Dhome : ‘सोनम वांगचुक यांच्या जीवावर…’ अभिनेत्याने सरकारवर साधला निशाणा! केली पोस्ट
याच शोमध्ये आकांक्षाने तिच्या लैंगिक ओळखीबाबतही भाष्य केले. “सध्या मला ना पुरुषांसोबत, ना महिलांसोबत कोणतेही रोमँटिक किंवा लैंगिक नाते ठेवायचे आहे. माझ्या आयुष्यातील हा एक वेगळा टप्पा आहे आणि मी त्याला ‘असेक्शुअलिटी’ मानते,” असे तिने सांगितले. दरम्यान, आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. जवळपास दहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.






