सर्वसामान्यांना महागाईचा बसणार फटका; गहू, खाद्यतेलानंतर आता तांदूळ महागले
नवी दिल्ली : खाद्यतेल, गहू आणि पीठ आधीच महाग झाले आहेत. आता तांदूळही महाग होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात तांदळाच्या दरात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली. भात पेरणीला झालेला विलंब हे यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ५५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला तांदूळ आता ६० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. इतकेच नव्हे, तर पूर्वी ७० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला चिन्नोर तांदूळ आता ७५ ते ८० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
तसेच ३५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला खंडा तांदूळ आता किमान ४५ रुपये प्रति किलो. गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे केवळ डाळी आणि पीठच नव्हे, तर तांदूळही सर्वसामान्यांसाठी महाग होत आहे. हिरव्या भाज्या, बटाटे, कांदे, टोमॅटो आणि धान्यांच्या भाववाढीमुळे घरातील अन्नधान्यही महाग झाले आहे. तांदळाच्या भाववाढीचे मुख्य कारण म्हणजे दुर्लक्षित आणि उशिरा आलेला मान्सून, ज्यामुळे भात पिकाच्या लावणीवर परिणाम झाला आहे आणि देशातील अनेक भागांतील तांदळाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
कमी आवक आणि उत्पादन घटण्याच्या भीतीमुळे प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे स्वयंपाकघराचे बजेट वाढले आहे. बाजारात गहू महाग झाल्यामुळे पिठाचे भाव वाढत आहेत. कौटुंबिक उत्पन्न तेच राहिले असले तरी, महागाईचा परिणाम अन्नपदार्थांवर होत आहे. पीठ आणि तांदूळ खरेदी करणे पूर्वर्वीपेक्षा महाग झाले आहे. नवीन पीक येईपर्यंत तांदळाचे भाव मजबूत राहतील, कारण सध्या तांदळाला जागतिक मागणी खूप जास्त आहे.
६० ते ८० रुपये प्रति किलो दराने विक्री
नोव्हेंबरमध्ये धान आणि तांदळाची आवक सुरू होते. सध्या बाजारात केवळ १०० ते २०० पोती तांदूळ येत आहे. यावर्षी अनेक भागांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे पिकांची पेरणीही झाली नाही. जिथे पेरणी झाली, तिथे पावसाअभावी बियाणे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. आता नवीन पीक चांगले आले तरच भावांना दिलासा मिळू शकतो. सध्या भंडारा, तुमसर आणि गोंदिया येथून बाजारात तांदूळ येत आहे. या तांदळाच्या दरातही वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे.






