AIMIM प्रदेशाध्यक्षांचा लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान (Photo Credit- X)
सभेत उपस्थितांना संबोधित करताना शौकत अली यांनी आपल्या कुटुंबातील मुलांच्या संख्येचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “मला स्वतःला ८ मुले आहेत. माझ्या थोरल्या भावाचे निधन झाले, त्यांना १६ मुले होती. माझ्या ९७ वर्षीय आईला आज ७२ नातवंडे आहेत आणि ती सर्व ६-६ फुटांची तरुण मुले आहेत. मग आमच्या लोकसंख्येची एवढी भीती कशाला वाटते?”
मुरादाबाद, यूपी: AIMIM के यूपी प्रदेश अध्यक्ष शौकत अली ने एक जनसभा के दौरान कहा “…हम आज से एक नारा देंगे हम दो हमारे दो दर्जन। हमारे 8 बच्चे हैं। हमारे बड़े भाई के 16 बच्चे हैं। हमारी माता की उम्र 97 साल है। उनके कम से कम 72 नाती और पोते जवान हैं। हमारी तादाद से घबराहट क्यों… pic.twitter.com/60j0GzoOJF — IANS Hindi (@IANSKhabar) February 9, 2026
“ज्यांना मुले होत नाहीत, ते अनेक ठिकाणी माथा टेकतात. अल्लाह जेव्हा स्वतःहून मुले देत आहे, तर ती आनंदाने स्वीकारली पाहिजेत. जोपर्यंत अल्लाह देतोय, तोपर्यंत घेत राहा,” असे अजब तर्क अली यांनी मांडले.
“काही लोक आमच्या वाढत्या लोकसंख्येमुळे घाबरले आहेत. पण जितकी लोकसंख्या जास्त, तितका देश मजबूत होतो. चीनची लोकसंख्या जास्त आहे, म्हणूनच तो देश आज जगातील एक महासत्ता आहे,” असा दावा त्यांनी केला.
भाजप नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, “जे लोक स्वतः लग्न करत नाहीत, तेच हिंदूंना ४ मुले जन्माला घालण्याचे ज्ञान देतात. मी तर म्हणेन की हिंदू बांधवांनी ४ नाही तर १४ मुले जन्माला घालावीत, जेणेकरून देश अधिक शक्तिशाली होईल.”
लोकसंख्येसोबतच शौकत अली यांनी राजकीय आरोपही केले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या दंग्यांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. “देशात झालेल्या ५० हजार दंगलींमध्ये ९० टक्के मुस्लिम मारले गेले. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत २ लाख २५ हजार मुस्लिमांचे प्राण गेले असून, त्यावेळी काँग्रेसचीच सत्ता होती,” असा आरोप त्यांनी केला.
Kanpur Lamborghini Accident: 10 कोटींच्या लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडले, कोण आहे शिवम मिश्रा?






