नवी दिल्ली : बिहारमधील इंडिया आघाडीतील जागावाटपाचा मुद्दा राजद आणि काँग्रेसमध्ये अडकला आहे आणि त्यामुळे जागावाटपाची घोषणा होऊ शकली नाही. लालू यादव यांच्या पक्षाने मित्रपक्षांशी सल्लामसलत न करता पहिल्या टप्प्यासाठी लोकसभेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर केलेल्या राजदच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
राजदने औरंगाबादमधून अभय कुशवाह, गया राखीव जागेवरून सर्वजित कुमार, नवाडामधून श्रावण कुशवाह आणि जमुईमधून अर्चना रविदास यांना तिकीट दिले आहे. राजदच्या या निर्णयावर काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
पक्षांच्या विलीनीकरणावर आक्षेप
पप्पू यादव यांच्याबाबतही राजद आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. नुकतेच माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यांनी आपला पक्ष जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. यावर राजदने नाराजी व्यक्त केली आहे. पप्पू यादव यांचे लालू कुटुंबियांशी त्यांचे कडूगोड संबंध आहेत. पप्पू यादवसाठी राजद पूर्णिया किंवा मधेपुरा ही जागा सोडणार नसल्याचे राजद म्हणणे आहे.
पप्पू यादव हे 2004 पोटनिवडणूक आणि 2014 मधेपुरामधून राजदचे खासदार राहिले आहेत. यादव यांनी पूर्णिया येथून (1991 अपक्ष, 1996 सपा, 1999 पुन्हा अपक्ष) निवडणूक जिंकली आहे. 2004 आणि 2009 मध्ये, उदय सिंह भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले होते, जे आता काँग्रेसमध्ये आहेत आणि 2019 मध्ये त्यांनी तेथून निवडणूक लढवली आहे. पप्पू यादव हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार रंजित रंजन यांचे पती असून विहारच्या सीमांचल आणि कोसी भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. 2015 मध्ये त्यांची राजदमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जन अधिकार पक्षाची






