पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागरिकांना भावुक आवाहन, म्हणाले.... (Photo Credit- X)
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला आहे:
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to… — Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
‘भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले’; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार
समाजातील परस्पर मदतीच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा जेव्हा शक्य असेल, तेव्हा एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी देण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. शिवाय, या कडाक्याच्या उन्हात वाटसरूंना दिलासा देण्यासाठी, जे लोक आपल्या घराबाहेर किंवा दुकानांबाहेर माठातील थंड पाणी ठेवतात, अशा लोकांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
या ऋतूत वृद्धांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन, पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाला आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर प्रियजनांच्या तब्येतीची व कुशलतेची नियमितपणे चौकशी करावी. आपल्या घरातील ज्येष्ठांना पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे, दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे पूर्णपणे टाळण्यास सांगावे आणि शक्य तितकी विश्रांती घेण्याचा सल्ला द्यावा, असा सल्ला त्यांनी लोकांना दिला.
केवळ मानवांपुरतेच मर्यादित न राहता, पंतप्रधान मोदी यांनी मुक्या जीवांच्या हालअपेष्टांचीही दखल घेतली. या तीव्र उष्णतेच्या लाटेत तहानलेल्या पक्ष्यांना सहजपणे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लोकांनी आपल्या घराबाहेर, बाल्कनीमध्ये, गच्चीवर, दुकानांबाहेर किंवा कार्यालयाबाहेर पाण्याने भरलेले एखादे छोटे भांडे ठेवावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. शेवटी, पंतप्रधानांनी असे नमूद केले की, या तीव्र उष्णतेच्या काळात आपण केवळ एकमेकांचीच नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेल्या इतर सजीव प्राण्यांचीही संवेदनशीलतेने आणि करुणेने काळजी घेतली पाहिजे.






