प्रियांका गांधी यांची भारताचा अर्थसंकल्प 2026 मधून अपेक्षा नसल्याची नाराजी व्यक्त केली (फोटो - सोशल मीडिया)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी संसदेच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून सामान्याच्या हिताचे निर्णय येतील अशी अपेक्षा नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. संसदेच्या आवारामध्ये माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की मला जास्त काही अपेक्षा तर नाहीत. पण बघूया, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी देखील केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “हा सुधारणांचा अर्थसंकल्प नाही, तर तो विकृत अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या ५% लोकसंख्येसाठी आहे. भाजप फक्त स्वतःच्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.” समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव म्हणाले, “या अर्थसंकल्पाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही.” अशा शब्दांत विरोधक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी काय म्हणाले?
भारताच्या अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक संरचनात्मक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ज्या एका दशकापासून सोडवल्या गेलेल्या नाहीत. खाजगी भांडवली गुंतवणुकीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. थेट परकीय गुंतवणुकीत घट झाली आहे. मला आशा आहे की अर्थमंत्री भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक असमानता ओळखतील आणि त्या दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील.”अशी अपेक्षा मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : Union Budget 2026: आजपासून वाढणार स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या
आप खासदार संजय सिंह यांची प्रतिक्रिया
आप खासदार संजय सिंह म्हणाले, “पंतप्रधानांनी पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा त्यांनी देशातील तरुणांना आश्वासन दिले होते की ते दरवर्षी २० दशलक्ष नोकऱ्या निर्माण करतील. म्हणून, आम्हाला २४ कोटी नोकऱ्यांचा हिशोब हवा आहे. नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले? शेतकऱ्यांच्या उत्पादनाची किंमत दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? आम्ही सरकारला विचारू इच्छितो: काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले? त्यांनी याचे उत्तर द्यावे. त्यांनी महागाईचे स्पष्टीकरण द्यावे. कधी ते कर वाढवतात, कधी ते कमी करतात. सरकारने देशाची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. आज आपण पाहू की ती पुन्हा रुळावर कशी आणली जाईल.” असा टोला संजय सिंह यांनी लगावला आहे.






