संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची राहुल गांधींची मागणी, PM मोदींना लिहिलं पत्र
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. दोन्ही देशांचे संबंध इतके ताणले होते की भीषण युद्धाची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतरही पाकिस्तानकडून सीमा भागात ड्रोन हल्ले केले जात आहेत. दरम्यान या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान
”पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि आजच्या युद्धबंदीवर चर्चा करणे भारतीय जनतेसाठी आणि त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींसाठी खूप महत्त्वाचं आहे. युद्धबंदीची घोषणा प्रथम अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आमचा सामूहिक दृढनिश्चय दाखविण्याची ही एक संधी असेल. मला विश्वास आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने आणि जलदगतीने विचार कराल, असं राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
LoP Shri @RahulGandhi writes to PM Modi, reiterating the unanimous request of the Opposition to convene a special session of Parliament immediately to discuss the Pahalgam terror attack, Operation Sindoor and the India-Pakistan ceasefire, first announced by U.S. President Trump. pic.twitter.com/AhKRjRsunk
— Congress (@INCIndia) May 11, 2025
युद्धबंदीनंतर विरोधी पक्षनेते संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहिले होते. युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर त्यावर सामूहिक चर्चा होणे अत्यंत आवश्यक असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
India-Pakistan ceasefire: युद्धबंदी कराराबाबत काय चर्चा झाली…? काय म्हणाले विक्रम मेस्त्रीं
My letter to PM Shri @narendramodi requesting to convene a special session of the Parliament to discuss the Pahalgam Terror Attack, Operation Sindoor and the Ceasefire announcements first from Washington DC and later by the Governments of India and Pakistan. pic.twitter.com/bhHf3euTkk
— Mallikarjun Kharge (@kharge) May 11, 2025