पुणे, शहर: शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता विशेष फेरी क्रमांक १ (ओपन टू ऑल) सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीत अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार असल्याची शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली.
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ९ हजार ६६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २२ लाख १४ हजार ४०६ प्रवेशक्षमतेच्या जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी आतापर्यंत १४ लाख ७३ हजार १४७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले असून, त्यापैकी ७ लाख ७८ हजार २५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
विशेष फेरी क्रमांक १ (ओपन टू ऑल) साठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया २९ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. या फेरीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली आहे.
Google सोडून सुरू केला स्टार्टअप! अब्जावधींच्या एआय क्षेत्रात युसूफ इम्रान यांनी कशी मारली बाजी?






