आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आसाम दौरा केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
आसामधील विश्वनाथ जिल्ह्यात राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचार करताना त्यांनी हिमंत बिस्वा सरमा यांना धारेवर धरले. ते मुख्यमंत्र्यांना भारताचे “सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री” म्हटले आणि सरमा यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी शासकीय संसाधनांचा गैरवापर करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या वक्तृत्वातून त्यांची निराशा आणि भविष्याबद्दलची चिंता दिसून येते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर द्वेष पसरवण्याचा आणि आसामची संस्कृती व बंधुत्वाला हानी पोहोचवण्याचाही आरोप केला.
हे देखील वाचा : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली
राहुल गांधी यांनी आपल्या ‘बब्बर शेर’ या वाक्प्रचाराचा वापर करत म्हणाले की, गौरव गोगोई यांच्यासारखे काँग्रेस नेते त्यांना तुरुंगात पाठवायला तयार आहेत आणि जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येईल, तेव्हा त्यांना जनतेची आणि नेत्यांची माफी मागावी लागेल.
LIVE: Public Meeting | Biswanath, Assam https://t.co/L0BFWNZZHS — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 5, 2026
आसामचा कारभार दिल्लीतून
राहुल गांधी यांनी आसामचा कारभार पूर्णपणे दिल्लीतून चालत असल्याची टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती आहे. आसामचा कारभार दिल्लीतून चालवला जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे सांगतात, तेच हिमंता करतात. हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला भ्रष्टाचारात गोवले आहे, ज्यामुळे आता तेही यात गोवले जातील. कायदेशीर कारवाईतून कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा राहुल गांधींनी दिला.
हे देखील वाचा : मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी आरोप केला की, आसाम सरकार द्वेषपूर्ण राजकारण करून बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या खऱ्या समस्यांवरून लक्ष विचलित करत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आसाम बदलाची लाट नव्हे, तर वादळ अनुभवत आहे आणि जर भाजप सरकार पडले, तर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रत्येक कृतीचे उत्तर द्यावे लागेल. सभेतील प्रचंड गर्दीमुळे काँग्रेसचे मनोधैर्य वाढले असून काँग्रेस नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.






