नागपूर (Nagpur). करोनाच्या संकटामुळे (Congress leader) सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते (the Congress leader) व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक (director of the Agricultural) हुकुमचंद आमधरे (Hukumchand Amdhare) केला.
राजकारण्यांना दोष देणं बंद करा
करोनाच्या संकटामुळे सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे केला. या दरवाढीचा फटका बळीराजाला बसणार असल्याने ही वाढ तत्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
[read_also content=”चिखली येथील कोव्हिड केअर सेंटरच्या डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे; सोशल मीडियावर पेटला वाद https://www.navarashtra.com/latest-news/collective-resignation-of-doctors-of-covid-care-center-at-chikhali-light-up-the-debate-on-social-media-nrat-129881.html”]
हुकुमचंद आमधरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य संबंधितांना निवेदन पाठवून भाववाढ कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
करोनामुळे सर्व ठप्प असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने बळ दिले. अन्नधान्य, भाजीपाल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही. त्याच बळीराजाच्या जीवावर केंद्रातील राज्यकर्ते उठले आहे. केंद्राच्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभारले. त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाचा वचपा म्हणून खताची भाववाढ केली आहे. एकीकडे आधीच महामारीचे संकट असताना खतांचे भाव दाम दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होईल.
सरकारने कर्मचारी व अनेकांना कोव्हिड योद्धे जाहीर केले, विमा कवच दिले. मात्र, शेतकऱ्यांना कुठलीही सुरक्षा दिली नाही. बाजारभावाची कोणतीही हमी नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आसमानी संकट पाचवीला पूजले असताना आता सुलतानी संकटही डोक्यावर लादले आहे, अशी टीकाही आमधरे यांनी केली.
अकराशे रुपयांचे डीएपी खत १९०० रुपये झाले. यावरून या दरवाढीचा अंदाज लावता येईल. ६५ रुपयांचे डिझेल ९२ रुपये केल्याने मालवाहतुकीचे दर वाढले. कर्ज काढून किंवा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चालवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना तारणार की मारणार, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, असेही हुकुमचंद आमधरे म्हणाले.