शरीरात 'या' विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध
विटामिनची कमतरता कशामुळे उद्भवते?
हाडे ठिसूळ होण्याची कारणे?
रोगप्रतिकारशक्ती कशामुळे कमी होते?
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन कायमच केले जाते. कधी फळे तर कधी भाज्या खाऊन शरीराला आवश्यक पोषण दिले जाते. रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषण मिळते. पण बऱ्याचदा चुकीचा आहार, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव आणि शारीरिक हालचालींची कमतरता निर्माण झाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. शरीरास आवश्यक असलेल्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यामुळे आरोग्य बिघडते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारशी लक्षणे दिसून येत नाही, पण कालांतराने शारीरिक समस्या वाढतात आणि शरीराला हानी पोहचते. ही लक्षणे वेळीच न ओळखळल्यामुळे गंभीर आजारांची शरीराला लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
शरीराला सर्वच विटामिनची सम प्रमाणात आवश्यकता असते. पण काहीवेळा जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे विटामिनची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने समस्या आणखीनच वाढू लागतात. विटामिन बी१२, विटामिन डी किंवा फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे कायमच थकल्यासारखे वाटते आणि कोणतेही काम करताना अशक्तपणा आणि काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. आज आम्ही तुम्हाला कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. हे आजार शरीर आतून पोखरून टाकतात आणि शरीरास धोका निर्माण करतात.
बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणात केस गळणे, नखे ठिसूळ होणे इत्यादी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच वाढतात आणि शरीरास धोका निर्माण करतात. बायोटिन, व्हिटामिन डी, लोह आणि इतर जीवनसत्त्वे आवश्यक प्रमाणात शरीरास न मिळाल्यामुळे नखं सहज तुटणे किंवा मोठ्या प्रमाणावर केस गळून टक्कल पडण्याची जास्त भीती असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे.
त्वचा कोरडी पडणे, ओठ सतत फुटणे किंवा तोंडाच्या कोपऱ्यांना जखमा होणे ही लक्षणे जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दिसून येतात. विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन सी आणि लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा आणि ओठ कोरडे पडून जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. वारंवार सर्दी, खोकला किंवा संसर्ग होणे इत्यादी समस्या रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे उद्भवतात. विटामिन सी, विटामिन डी आणि झिंकची कमतरता निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते.
Money Plant: घरातील मनी प्लांट सुकतोय? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, होईल हिरवेगार
हाडे दुखणे, सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंमध्ये वेदना होणे आणि वारंवार पाठ दुखणे इत्यादी लक्षणे विटामिन डी च्या कमतरतेमुळे उद्भवतात. याशिवाय काहींना हातापायातून मुंग्या येणे, स्नायूंमध्ये गोळे येणे इत्यादी लक्षणे सुद्धा दिसू लागतात. त्यामुळे विटामिनच्या कमतरतेकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. मन सतत अस्वस्थ राहणे, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होणे किंवा मूडमध्ये वारंवार बदल होणे यांसारखी लक्षणे विटामिन बी१२ आणि विटामिन डी च्या कमतरतेमुळे उद्भवतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे.






