स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत 'हे' प्रेरणादायी सुविचार
कोणत्याही क्षेत्रात काम करताना मनात सकरात्मक ऊर्जा असणे फार आवश्यक आहे. शालेय जीवनात अनेक नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. या काळात मिळालेल्या संधीचे सोने करणे फार आवश्यक आहे. कारण स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात कायम टिकून राहण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. या काळात योग्य विचार, सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांची साथ मिळाली तर यश मिळवणे अवघड नाही. त्यामुळे कठीण प्रसंगात कोणत्याही वेळी खचून गेल्यासारखे वाटल्यास हे प्रेरणादायी सुविचार नक्कीच वाचा. हे सुविचार कठीण प्रसंगात धैर्य देतात, अपयशातून शिकण्याची ताकद देतात आणि ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतात.मनात वाढलेली नकारात्मकता कमी करण्यासाठी पुस्तकाचे वाचन करावे. यामुळे मानसिक तणाव कमी होतो.(फोटो सौजन्य – istock)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा …
“स्वप्न ती नसतात जी आपल्याला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत.” – ए.पी.जे. अब्दुल कलाम
“प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकणे.”.
“ध्येय आणि चिकाटी यशाची शिखरे सर केल्याशिवाय राहत नाही.”.
“वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा, जी आपली वेळ बदलू शकेल.”.
“कठीण परिस्थितीतून मिळवलेले धडे हे आयुष्यातील सर्वात मोलाचे धडे असतात.”. .
आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे; ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून, तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा.
स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे; त्यांना साकारण्यासाठी, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पीछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा.
जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात; त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळविण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या.
प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो; त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.
आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे.
अडचणी ही जीवनाची एक भाग आहेत; त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो.
सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन उर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे.
यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला सतत विकसित करत रहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत.
‘अपयशाचा हंगाम’ हाच यशाची बीजे पेरण्याचा
सर्वोत्तम काळ असतो- स्वामी परमहंस योगानंद.
तुमच्यासमोर 9 ससे असतील
आणि तुम्हाला एक पकडायच्या असेल.
तर फक्त एकावरच लक्ष केंद्रित करा- जॅक मा.
भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल
तर तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहचू शकणार नाही
त्यापेक्षा बिस्किट टाका आणि पुढे चला- धीरूभाई अंबानी.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात,
तर अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
जेव्हा सगळंच संपून गेलय
असं आपल्याला वाटतं तीच
खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरू करण्याची….
शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर,
आपल्या दृढनिश्चयावर अवलंबून असते.
काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे,
म्हणूनच सध्या आम्ही मैफिलीत दिसत नाही.
ज्यांनी तुमची धडपड पहिली आहे,
फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी
किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही
फक्त नशीबवान असता.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही कारण
मी अजून जिंकलेलो नाही…
International Yoga Day Quotes 2025: योगाने तनामनाला मिळेल उर्जा …
जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना,
तेवढं ताकदवान राहाल, अजिबात
कोणाच्या भरवशावर बसू नका,
स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि
स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभ करा..
खरं समोर आल्यावर सुध्दा जो
माणूस खोट्या वर खोटं बोलतो,
तो माणूस कधीही सुधरू शकत नाही
आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही..






